शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

सातारा जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:27 AM

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आला असून २३ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा ...

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आला असून २३ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत असून मृत्यूदेखील वाढले असल्याने सातारा जिल्ह्यावर चिंतेचे सावट पसरले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी २३ जण मृत्युमुखी पडले, त्यामध्ये सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी ९ रुग्णांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यांमधील रुग्णसंख्यादेखील कमी होत नसल्याचे चित्र असून कऱ्हाड तालुक्यात २६६ तर सातारा तालुक्यात १७० नवे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून गुरुवारी पाटणमध्ये ६५ रुग्ण आढळून आले आहेत.

प्रशासनाच्यावतीने तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून तपासण्या करण्यात येत आहेत. सोमवार दि. २१ रोजी ४५१ इतके रुग्णाला सापडले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलेला दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते, मात्र, पुन्हा संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांमध्ये शिथिलता देऊन दुकानांच्या वेळा वाढविल्या आहेत. ही संधी साधून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लोक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने रुग्णसंख्या कमी होत नाही.

जावली, महाबळेश्वर हे तालुकेवगळता इतर तालुक्यांमध्ये अजूनही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आले असले तरी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. या तालुक्‍यात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली असल्याने हा तालुका देखील रुग्णसंख्येत बाधित होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

जावली, खंडाळा, माण महाबळेश्वर, वाई या तालुक्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही; परंतु इतर तालुक्यांमध्ये मात्र बाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ४ हजार २७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७४८ जणांना घरी सोडण्यात आले तर ८ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

चौकट

पावणे दोन लाख रुग्ण झाले बरे

जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख २२ हजार ६०८ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या त्यातून १ लाख ८८ हजार ७६९ लोक कोरोनाबाधित आढळले. त्यातील १ लाख ७६ हजार ६१३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले.