शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिहे-कटापूर योजनेला २० कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2015 00:18 IST

येळगावकर यांची माहिती : मुख्यमंत्र्यांचा खास बाब म्हणून निर्णय

सातारा : ‘जिहे-कटापूर योजनेच्या अंतर्गत बॅरेजच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी मंजूर केला आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. येळगावकर म्हणाले, ‘जिहे-कटापूर योजनेला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करीत आलो आहे. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर सत्कारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. जिहे-कटापूर योजनेच्या कृष्णा नदीवरच्या बॅरेजचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी झाले नाही तर पावसाच्या पुरामध्ये झालेले बांधकामही वाहून जाण्याची भीती त्यांच्यासमोर ठेवली. पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही यामध्ये खूप सहकार्य केले.’‘आणखी याच्या पुढचा लढा आहे तो म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता इतर प्रकल्पांना मिळविणे. त्यामध्ये उरमोडी आणि टेंभू आहे. जिहे-कटापूर योजना झाली म्हणजे माणचे आणि खटावचे दुखणे संपले असे नव्हे.उरमोडीमध्ये आज तीनच पंप कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी खटाव, माणमध्ये जात नाही. त्या ठिकाणी किमान आठ ते नऊ पंप बसले तर हे पाणी खटाव आणि माणमध्येही जाऊ शकते. त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. ती मिळविण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी निकराचे प्रयत्न करणार आहे. तसेच प्रयत्न टेंभूच्या बाबतीतही चालू आहेत. टेंभूचे पाणी हे खटाव, माणच्या पूर्व भागाला मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिहे-कटापूरच्या बाबतीतला हा पहिला विजय आहे. कारण सुधारित प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा हा निधी मिळाला आहे. आता पुढचा टप्पा आहे तो नेर आणि आंधळीमध्ये पाणी सोडायचा. नेरमधील पाणी हे एका वर्षात येऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आमचे शिष्टमंडळ लवकरात लवकर राज्यपालांना भेटून हा निधी उपलब्ध कसा होईल आणि अनुशेषामध्ये अडकलेली ही जिहे-कटापूर योजना कशी बाजूला काढता येईल, असा प्रयत्न सुरू आहे. - दिलीप येळगावकर, माजी आमदारटेंभूू योजना लघुसिंचनाखाली घ्यावीज्यावेळी टेंभू योजना मंजूर झाली, त्यावेळी खटाव, माणचा पूर्व भाग हा गृहीत धरला नव्हता. आता गृहीत धरायला लावायचा आहे. त्यामुळे व्याप्तीमधला बदल आहे. तो राज्यपालांनी स्वीकारला पाहिजे.त्यासाठी मंत्रिमंडळाने जशी जिहे-कटापूरची शिफारस केली, तशी टेंभूचीही केली पाहिजे. टेंभू ही योजना पूर्णपणे लघुसिंचनाखाली घ्यावी, अशीही आमची मागणी असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.