शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही अडतीचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच

By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST

शासननिर्णयाने संभ्रमावस्था : अडतदार खरेदीदारांच्या भूमिकेत जाण्याची चिन्हे

अंजर अथणीकर / सांगलीकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहारातील अडत रद्द करण्याच्या पणन मंडळाच्या निर्णयाने बाजार समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्रथमदर्शनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने असला तरी, अडतीचा अप्रत्यक्ष भुर्दंड हा शेतकऱ्यालाच बसणार आहे. अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी, तेवढ्या रकमेचा फटका शेतीमालाच्या दराला बसणार असल्याने हा भार शेतकऱ्यालाच सोसावा लागेल.पणन मंडळाने शेतीमाल खरेदी-विक्रीतील अडत रद्द करुन शेतकऱ्यांनी आता थेट आपल्या मालाची विक्री करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे गेल्या ६० वर्षांपासून बाजार समितीमध्ये असणाऱ्या अडत्याची भूमिका आता बदलणार आहे. सांगलीतील लहान-मोठ्या ४२५ अडत व्यापाऱ्यांची शासन निर्णयाने संभ्रमावस्था झाली आहे. शेतकरी बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल आणतो, तेव्हा त्याला बाजारातील दरांची माहिती नसते. त्यामुळे तो आपला माल अडत्याकडे ठेवतो. अडत्या त्यासाठी आपल्या गोदामाचा वापर करू देतो. जेव्हा खुल्या बाजारात शेतीमालाचे लिलाव निघतात, तेव्हा अडत्या हा माल लिलावात ठेवतो. जेव्हा या मालाला मागणी होते, तेव्हा शेतकऱ्याला याची माहिती देऊन त्याच्या परवानगीने त्याची लिलावात विक्री करतो. यासाठी बाजार समितीकडे नोंदणी करणे, वजन करणे आदी प्रक्रिया अडत व्यापारी पार पाडत असतो. यासाठी त्याला तीन टक्के कमिशन मिळत असते. अर्थात हे कमिशन शेतकरी अडत व्यापाऱ्याला देतो. आता ही अडत पध्दत रद्द करुन शेतकऱ्यांनी हा माल खरेदीदारांकडे द्यावा, असा निर्णय झाला आहे.पणन मंडळाच्या या निर्णयाने अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. यापूर्वी खरेदीदार हा अडत्याचे कमिशन वजा करुन शेतीमाल खरेदी करीत असे. आता तो या कमिशनएवढी रक्कम कमी करुन मालाची खरेदी करेल. त्यामुळे शेतीमालाला जेवढी किंमत यापूर्वी मिळत होती, तेवढीच किंमत त्याला यापुढेही मिळणार आहे.