शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांनी दर का दिला नाही?

By admin | Updated: March 31, 2015 00:27 IST

राजू शेट्टी : स्वत:ला ‘शेतकऱ्यांचे तारणहार’ समजणारे दर देण्यात मागे का?

इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५00 ते २६00 रुपये पहिली उचल दिली आहे. शिराळ्याच्या डोंगरी भागात असलेल्या निनाईदेवी कारखान्याचे चालक दालमिया यांनीही २५00 रुपये दर दिला आहे, तर शेतकऱ्यांचे तारणहार असणारे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मात्र २0५0 रुपये पहिली उचल दिली, तीही दोन हप्त्यात! तीन हजार रुपये देऊ, असे म्हणणारे जयंत पाटील आता का दर देऊ शकत नाहीत? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना आज (सोमवारी) उपस्थित केला.जयंत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यामध्ये खा. शेट्टी यांच्यावर सडकून टीका सुरू केली आहे. त्या टीकेने अस्वस्थ झालेल्या खा. शेट्टी यांनी आज ‘लोकमत’शी संपर्क साधून जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उसामध्ये असा काय फरक आहे, म्हणून दोन्ही जिल्ह्यातील उसाच्या दरामध्ये तब्बल ५00 रुपयांची तफावत केली जात आहे? विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड पैसा खर्च केला आहे, त्याची वसुली ऊस उत्पादकांकडून केली जात आहे का? की, बारामती येथे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी मेजवानी दिली, त्याच्या वर्गणीची वसुली केली जात आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.शेट्टी म्हणाले की, जयंत पाटील उसाचा दर देण्यात मागे पडले आहेत. एक तर त्यांचा कारखाना प्रचंड कर्जबाजारी झाला असावा, नाही तर व्याजाचा आर्थिक बोजा पडला असावा. त्यामुळेच त्यांच्या कारखान्याने एफआरपीनुसार निर्धारित केलेला दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे. शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर देण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांच्या कारखान्याने कमी दर देऊन विधानसभा निवडणुकीत झालेला, तसेच पंतप्रधानांच्या बारामतीमधील मेजवानीचा खर्च काढल्यामुळे, त्यांच्या दराचा मेळ बसत नसावा. जयंत पाटील यांनी कमी दर का दिला याचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

जयंत पाटील यांची सडकून टीका
माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांचा सध्या मतदारसंघात आभार दौरा सुरू आहे. मेळाव्यात शेट्टी यांच्या भूमिकेबाबत जयंत पाटील सडकून टीका करीत आहेत. खासदार म्हणून राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले? आज साखर उद्योग अडचणीत असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते मंत्रीपदाची वाट पाहात आहेत. सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना केंद्राकडून साखर अनुदानासाठी प्रयत्न करता आले असते, पण अद्याप मंत्रीपदाची आशा असल्याने ते केवळ आंदोलनाची भाषा करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप जयंत पाटील सातत्याने करीत आहेत.