शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळच्या चौकीतील पोलीस गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 00:00 IST

ग्रामस्थांचा सवाल : कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी

सुशांत घोरपडे -म्हैसाळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी पोलीस चौकी नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. आठवड्यातून पाच दिवस ही चौकी बंदच असल्याने, एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणार का, असा सवाल ग्रामस्थांतून होत आहे. म्हैसाळ पोलीस चौकीअंतर्गत म्हैसाळ, आरग, बेडग, लिंगनूर, शिंदेवाडी, बेडग, नरवाड, विजयनगर, बेळंकी यांसह पंधरा गावांचा समावेश होतो. या गावांची लोकसंख्या विचारात घेता, म्हैसाळ येथील पोलीस चौकीमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी असण्याची आवश्यकता आहे, पण या चौकीत आठवड्यातून दोन ते तीनच दिवस पोलीस कर्मचारी हजर असतात. या परिसरात नेहमी लहान-मोठे भांडणतंटे होत असतात. गावात वेळेवर पोलीसच हजर नसल्यामुळे काही भांडणे गावातील काही कार्यकर्तेच मिटवितात. मिरजेतून म्हैसाळमार्गे कागवाड, अथणी, चिक्कोडी, विजापूरसह कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. रात्री बारानंतर म्हैसाळ बसस्थानकालगतच रस्त्याकडेला काही चालक वाहने थांबवून चहा, नाष्टा करण्यासाठी येतात. अशावेळी अपघात घडतात. वड्डीनजीक म्हैसाळ येथील एका महिलेचे दागिने चोरट्यांनी हिसडा मारून पळवून कर्नाटक हद्दीत पलायन केले होते. यापूर्वी गावात तीन खून झाले आहेत. त्याचा तपास अद्याप गुलदस्त्यातच आहे. अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गावात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी असावा, अशी मागणी होत आहे.चौकी बंद असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोयबसस्थानकाजवळ वाहतुकीची पूर्णपणे कोंडी होते. लहान-मोठे वाद झाल्यानंतर तक्रार करायची झाल्यास चौकी बंद असल्याने मिरजेमध्ये जाऊन नागरिक तक्रार नोंदवत नाहीत. नंतर या वादातून मारामारीच्या घटना घडतात, अशी प्रतिक्रिया नागरिक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.म्हैसाळ औटपोस्टच्या अंतर्गत अनेक गावांचा समावेश होतो. त्यासाठी कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या भागातील अवैध धंदे करणाऱ्यांना कायदा दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ता मनोज जाधव यांनी व्यक्त केले.