शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील शेरीनाल्याचे काय होणार?

By admin | Updated: April 20, 2015 00:11 IST

प्रकल्प रखडला : सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीतच, महापालिकेचे दुर्लक्ष

सांगली : महापालिकेच्या शेरीनाल्याचे पाणी धुळगाव येथील शेतीला देणारी योजना अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेरीनाल्याचे दूषित पाणी पुन्हा कृष्णा नदीत सोडण्याची वेळ येणार आहे. घनकचरा प्रकल्पात महापालिकेला मोठा दणका बसला होता. आता शेरीनाल्याचेही बालंट पालिकेवर येऊ शकते. त्यासाठी आतापासूनच नियोजनाची गरज आहे.
शेरीनाला योजनेवर ४० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. केंद्र व राज्य शासनासोबतच महापालिकेच्या वाट्याची रक्कम खर्च होऊनही योजना कार्यान्वित झाली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर शेरीनाल्याचे पाणी धुळगाव हद्दीत पोहोचले. धुळगाव येथील १८०० एकर शेतीला पाणी मिळणार होते. त्यासाठी पालिकेने गावात शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यासाठी शेतजमीन घेतल्या. त्यात सहा मोठे आॅक्सिडेशन पॉँड उभारले आहेत. पण त्यालाही भेगा पडल्या आहेत. शेरीनाल्याचे पाणी आॅक्सिडेशन पाँडमध्ये येताच ते इतर जमिनीत शिरले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आॅक्सिडेशन पाँडमध्ये पाणीच थांबत नाहीत. या प्रकारानंतर शेरीनाला योजना बंद ठेवण्यात आली आहे.
ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी १४ कोटींची मागणी महापालिकेने पर्यावरण विभागाकडे केली आहे. हा प्रस्ताव सादर होऊन तीन वर्षे लोटली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. या निधीकडे डोळे लावून बसलेल्या पालिकेने अजून आशा सोडलेली नाही. या निधीतून धुळगाव येथे वितरण व्यवस्थेसह उर्वरित कामे होणार आहेत. पण आता योजनाच अडचणीत आल्याने निधी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. पंधरा वर्षे घनकचरा प्रश्नांत दुर्लक्ष केल्याचे परिणाम पालिकेला भोगावे लागत आहे. हरित न्यायालयाच्या दणक्यानंतर आता प्रशासन घनकचरा प्रकल्पाबाबत पळापळ करीत आहे. शेरीनाल्याचा प्रश्न तर त्यापेक्षाही भयानक आहे. नाल्यातील दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळते. दररोज ६० ते ७० एमएलडी पाणी नदीपात्रात जात आहे.
महापालिकेचा पाणीपुरवठा शेरीनाल्याचा उत्तर बाजूने होत असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत नाही, असा दावा पालिका करते. हा दावा खरा असला तरी नदीचे प्रदूषण होतेच, याकडे मात्र कानाडोळा केला जातो. (प्रतिनिधी)


पुन्हा वाभाडे निघणार?
घनकचरा प्रकल्पातून शहाणपण घेऊन शेरीनाला योजनेवरही गांभीर्याने निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा भविष्यात कोणी न्यायालयात धाव घेतली तर पुन्हा पालिकेचे वाभाडे निघणार, यात शंका नाही. यामुळे यातून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.