शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही पॅनेलकडून जतला झुकते माप

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

बाजार समिती निवडणूक : ‘रयत’कडून सात, तर शेतकरी पॅनेलकडून सहाजण रिंगणात

जयवंत आदाटे - जत-सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी वसंतदादा रयत पॅनेलच्या नेत्यांनी जत तालुक्यासाठी प्रथमच सात जणांना उमेदवारी देऊन झुकते माप दिले आहे. तसेच शेतकरी विकास पॅनेलच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे सहा नवख्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे पॅनेल प्रमुखांनी येथे जादा लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाठोपाठ आता बाजार समिती निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. वसंतदादा आणि शेतकरी पॅनेलच्या नेत्यांनी तालुक्यातील जत, शेगाव व उमदी या तीन जिल्हा परिषद मतदार संघातील एकही उमेदवार दिला नाही. बनाळी जिल्हा परिषद मतदार संघातील दोन्ही पॅनेलमध्ये प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी विकास पॅनेलकडे दिग्गजांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले होते. परंतु या सर्वांना बाजूला ठेवून नवीन चेहरे उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालानंतर आमदार विलासराव जगताप यांनी सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीला भाजपसोबत घेऊन त्यांना दोन जागा त्यांनी दिल्या आहेत. परंतु उमेदवारी डावलण्यात आलेल्या भाजपातील नाराज कार्यकर्त्यांची नाराजी त्यांना दूर करावी लागणार आहे. हे करीत असताना त्यांची तालुक्यात दमछाक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे प्रचाराची जबाबदारी स्वीकारणार आहेत. सोसायटी गट - रामचंद्र माने (येळवी), बसगोंडा जाबगोंड (बिळूर), ग्रामपंचायत गट - प्रमोद सावंत (अचकनहळ्ळी), आर्थिक दुर्बल गट - सदाशिव माळी (माडग्याळ), ओबीसी गट - सिद्धनगौडा पाटील (बोर्गी खु.), महिला - शारदा पाटील (पाच्छापूर) हे त्यांचे उमेदवार आहेत.वसंतदादा पॅनेलने प्रथमच सर्वाधिक सात जणांना उमेदवारी देऊन इच्छुक कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय समतोल राखण्यासाठी ऐनवेळी जत नगरपालिका नगरसेवक सुजय शिंदे यांची उमेदवारी कमी करुन रवींद्र सावंत यांचे नाव कायम केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाची मदत झाली होती. आता बाजार समिती निवडणुकीत त्यांनी जनसुराज्य पक्षासोबत युती करुन त्यांना एक जागा दिली आहे. जत तालुका राष्ट्रवादीने महादेव पाटील व सिद्धू सिरसाड या दोघांना उमेदवारी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत नसली तरी, त्यांचे मतदार आमच्यासोबत आहेत, असा दावा जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत व बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. प्रचारात जाहीरपणे सहभाग न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या येथील काही नेत्यांनी घेतला आहे. याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. खरी लढत काँग्रेस-भाजपमध्येचबाजार समिती निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेस-जनसुराज्य युती असली तरी, खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.सोसायटी गट- दयगोंडा पाटील ऊर्फ बिरादार (संख), मच्छिंद्र वाघमोडे (रेवनाळ), रवींद्र सावंत (बनाळी), ग्रामपंचायत गट - रामगोंडा संती (खोजानवाडी), आर्थिक दुर्बल गट - अभिजित चव्हाण (डफळापूर), ओबीसी - संतोष पाटील (सोन्याळ), महिला - सुगलाबाई बिराजदार (मुचंडी) असे वसंतदादा रयत पॅनेलचे जत तालुक्यातील उमेदवार आहेत.