शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यामधील दहा तलाव कोरडे

By admin | Updated: August 26, 2015 23:12 IST

भूजल पातळी घटली : केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक; टॅँकर भरण्यासाठीही पाणी नाही

गजानन पाटील - संखउन्हाची वाढती तीव्रता, मान्सून पावसाने दिलेली दडी, अवाजवी पाणी उपसा यामुळे कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडू लागले आहेत. २६ तलावांपैकी १० तलाव कोरडे व १० तलावातील पाणीपातळी मृतसंचयाखाली गेली आहे. तालुक्यातील भूजल पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. डाळिंब, द्राक्षे, फळबागांच्या पाण्यासाठी शेतकरी कूपनलिका, विहिरींची खुदाई करू लागला आहे. तलावामध्ये १० ते १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. निम्मा पावसाळा संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने दुष्काळाची गडद छाया निर्माण झाली आहे. सध्या महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. पाण्याचा उद्भव साठा संपत आल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.दुष्काळ हा तालुक्याच्या पाचवीला पूजलेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊसच झाला नसल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तालुक्यामध्ये सरासरी पर्जन्यमान ५२० मि. मी. इतके आहे. आजअखेर पक्त ८० ते ८५ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. पूर्व भागातील संख, दरीबडची परिसरात अत्यल्प पाऊस झाला आहे. खरिपाची पेरणीच झाली नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी विक्रमी प्रथमच ७०० ते ८०० फुटांपर्यंत गेली आहे. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंब, फळबागा धोक्यात आल्या आहेत. विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. रानामध्ये खुरट्या गवताची उगवण झाली नसल्याने पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मेंढपाळ शेळ्या, मेंढ्या घेऊन कऱ्हाड, सातारा, कर्नाटकातील काळ्या रानाच्या भागात व नदीकाठच्या परिसरात स्थलांतरित झाले आहेत. यावेळी प्रथमच या भागातून मेंढपाळांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. दरवर्षी कोल्हापूर भागातील मेंढपाळ येथे येतात. यावर्षी रानात गवत नसल्याने मेंढपाळ आले नाहीत.शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब, फळबागा घेतल्या आहेत. द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये छाटणी केली जाणार आहे. डाळिंब, फळबागांना मे महिन्यात पाणी सोडले आहे. फळधारणा झालेली आहे. सध्या डाळिंबाची फळे सुपारी, पेरूच्या आकाराची झाली आहेत. फळबागांना पाण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी रासायनिक खते, औषधावर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. बागा वाचविण्यासाठी विहीर, कूपनलिका खुदाई शेतकरी करू लागला आहे. तसेच खरीप हंगामाची फक्त २९ टक्केच पेरणी झालेली आहे. झालेल्या पेरणीतील पिकेही पावसाअभावी वाळून गेली आहेत.निम्मा पावसाळा झाला तरी सुद्धा दमदार पाऊस न पडल्यामुळे तालुक्यातील २६ तलावांपैकी १० तलाव कोरडे असून, १० तलावांतील पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे. सहा तलावांमध्ये फक्त १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मिरवाड, डफळापूर, बिळूर, दरीबडची, उमराणी, बेळोंडगी, खोजानवाडी, गुगवाड, तिकोंडी -१, तिकोंडी- २ हे तलाव कोरडे पडलेआहेत. तसेच संख मध्यम प्रकल्प व दोड्डानाला मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा मृतसंचयाखाली आला आहे. दरीबडची साठवण तलाव कोरडादरीबडची परिसरामध्ये गेल्या ५ वर्षापासून पाऊस कमी झाल्यामुळे साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलाव बांधल्यापासून २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर हा साठवण तलाव भरलाच नाही. या तलावात ४ कि.मी. अंतरावरून पाणी येते. उद्भव साठ्यात वाटेत बंधारे, पाझर तलाव आहेत. ते भरून पाणी द्यावे लागते.टॅँकरची वाढती संख्यातालुक्यातील २५ गावे आणि त्याखालील २१८ वाड्या-वस्त्यांवर २९ टॅँकरद्वारे ७७ हजार १३० नागरिकांना प्रतिदिन ३४ लाख ८ हजार लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मोरबगी, घोलेश्वर, सोनलगी, आवंढी, लोहगाव, बालगाव या गावातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांनी टॅँकरची मागणी केली आहे. सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंत तालुक्यात ४५ टॅँकर सुरू करावे लागणार आहेत. यामुळे प्रशासनाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.