शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘ताकारी, टेंभू’चा ऐन उन्हाळ्यात दिलासा

By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST

कडेगाव तालुक्यातील चित्र : नियोजनानुसार आवर्तनांमुळे शेतकऱ्यांमधून समाधान

प्रताप महाडिक - कडेगाव -ताकारी आणि टेंभू या दोन्ही सिंचन योजनांची आवर्तने यावर्षी नियोजित वेळेनुसार मिळाली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाभक्षेत्रातील शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासली नाही. त्यामुळे कडेगाव तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.कडेगाव तालुक्यात प्रत्येकवर्षी ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. उन्हाळा सुरू झाला की लगेचच अनेक गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु अलीकडच्या काही वर्षांत ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी आले आणि पाणीटंचाई कमी झाली. सुरूवातीच्या काळात वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे दोन्ही योजनांच्या पहिल्या आवर्तनास थोडासा विलंब लागला. परंतु तरी वीजबिल थकबाकी भरण्याची व्यवस्था झाली आणि दोन्ही योजनांचे पहिले आवर्तन सुरू झाले. त्यानंतर दुसरे, तिसरे आणि सध्या चौथे आवर्तनही नियोजित वेळेनुसार सुरू आहे.टेंभू योजनेच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातील ४५०० हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळते. योजनेचे चौथे आवर्तन सुरू आहे. टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याच्या अस्तरिकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. यामुळे आवर्तन सुरू झाले की पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय पोटकालव्यांचीही कामेही अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच कडेगाव तालुक्यातील ९५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळेल. त्यामुळे पाणीपट्टीचे दरही कमी होतील. वसुली योग्यप्रकारे होईल आणि योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.एकंदरीत दोन्ही योजनांच्या माध्यमातून कडेगाव तालुक्याला ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही योजनांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि लाभक्षेत्रामध्ये वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.अपुरा कर्मचारी वर्गताकारी आणि टेंभू दोन्ही योजनांचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू झाला आहे. लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणीपट्टी वसुली, आवर्तनांचे नियोजन ही कामे या विभागाकडे सोपविली आहेत. परंतु या विभागाकडे दोन्ही योजनांसाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे. यामुळे ही कामे केवळ ३० ते ४० टक्के कर्मचारी पूर्ण करू शकत नाहीत. शासन नवीन कर्मचारी भरती करीत नाही आणि कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करीत नाही. यामुळे सिंचन व्यवस्थापन विभाग अडचणीत सापडला आहे.यापुढे अडचण नाही...कडेगाव तालुक्यातील ६५०० हेक्टर लाभक्षेत्राला ताकारी योजनेद्वारे पाणी मिळत आहे. काही पोटकालव्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच लाभक्षेत्रातही वाढ होईल. लाभक्षेत्र वाढताच पाणीपट्टी दर कमी करता येतील. यामुळे पाणीपट्टी वसुलीलाही चांगला प्रतिसाद मिळेल. परिणामी वीजबिलाची थकबाकीही राहणार नाही. या साऱ्याचे फलित म्हणून सातत्य राहून योजना कार्यक्षमपणे चालवता येईल. सध्या ६२५० रुपये प्रति एकर इतकी पाणीपट्टी ऊस पिकासाठी आकारली जाते. ही पाणीपट्टी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून वसूल करून घेतात आणि योजनेकडे भरतात. ताकारी योजनेचे सध्या चौथे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने एप्रिल २०१५ अखेरचे वीजबिलही भरले आहे. आता चौथ्या आवर्तनाचे वीजबिलही पाणीपट्टी वसुलीतून भरण्यास कोणतीही अडचण नाही, त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.