शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

‘ताकारी-म्हैसाळ’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग

By admin | Updated: April 1, 2015 00:02 IST

शासनाचा अध्यादेश : बुधवारपासून कार्यवाही सुरू होणार

देवराष्ट्रे : ताकारी व म्हैसाळ योजनेच्या बांधकाम व प्रशासन विभागाकडे आतापर्यंत सिंचन व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी होती. यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत होता. ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे योग्य सर्वेक्षण होत नव्हते. याचा फटका योजनांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास बसत होता. याबाबत व्यवस्थापनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याचा अध्यादेश काढला आहे. ही कार्यवाही आजपासूनच (बुधवारी) सुरू होणार आहे, अशी माहिती ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत चालली असल्याने सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज भेडसावत होती. किंबहुना योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी या विभागाची योजनांना सक्त गरज निर्माण झाली होती. ताकारी योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार हेक्टर आहे. त्यामुळे अपुरी कामे, नवीन कामे, पाणी सुरू-बंद करणे, मोजणी करणे, आकारणी करणे आणि वसुली यासारख्या सर्व कामांचा अतिरिक्त बोजा बांधकाम व प्रशासन विभागावर पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे व शेतकऱ्यांना सोयी देणे कठीण बनले होते. याचा आर्थिक भुर्दंड योजनेला सहन करावा लागत होता. त्यामुळे ही योजना दिवसेंदिवस तोट्यातच चालली होती.
सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र व्हावा, यासाठी प्रशासनाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तसा याबाबत राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने म्हैसाळ योजनेच्या विभाग क्र. १ चे ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग असे नामांतर केले आहे. या मुख्य विभागांतर्गत ताकारी योजनेच्या दोन उपशाखा काम करणार आहेत. त्यापैकी एक शाखा वांगी (ता. कडेगाव) येथे, तर देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील दुसरी शाखा तासगाव येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दोन्ही शाखांना ताकारीच्या एकूण लाभक्षेत्रापैकी कमी-अधिक प्रमाणात क्षेत्राची विभागणी करून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)

‘ताकारी-म्हैसाळ’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग
शासनाचा अध्यादेश : बुधवारपासून कार्यवाही सुरू होणार
देवराष्ट्रे : ताकारी व म्हैसाळ योजनेच्या बांधकाम व प्रशासन विभागाकडे आतापर्यंत सिंचन व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी होती. यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत होता. ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे योग्य सर्वेक्षण होत नव्हते. याचा फटका योजनांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास बसत होता. याबाबत व्यवस्थापनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करण्याचा अध्यादेश काढला आहे. ही कार्यवाही आजपासूनच (बुधवारी) सुरू होणार आहे, अशी माहिती ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत चालली असल्याने सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज भेडसावत होती. किंबहुना योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी या विभागाची योजनांना सक्त गरज निर्माण झाली होती. ताकारी योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार हेक्टर आहे. त्यामुळे अपुरी कामे, नवीन कामे, पाणी सुरू-बंद करणे, मोजणी करणे, आकारणी करणे आणि वसुली यासारख्या सर्व कामांचा अतिरिक्त बोजा बांधकाम व प्रशासन विभागावर पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे व शेतकऱ्यांना सोयी देणे कठीण बनले होते. याचा आर्थिक भुर्दंड योजनेला सहन करावा लागत होता. त्यामुळे ही योजना दिवसेंदिवस तोट्यातच चालली होती.
सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र व्हावा, यासाठी प्रशासनाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तसा याबाबत राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने म्हैसाळ योजनेच्या विभाग क्र. १ चे ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग असे नामांतर केले आहे. या मुख्य विभागांतर्गत ताकारी योजनेच्या दोन उपशाखा काम करणार आहेत. त्यापैकी एक शाखा वांगी (ता. कडेगाव) येथे, तर देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील दुसरी शाखा तासगाव येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दोन्ही शाखांना ताकारीच्या एकूण लाभक्षेत्रापैकी कमी-अधिक प्रमाणात क्षेत्राची विभागणी करून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)
प्रत्येक उपशाखेच्या अंतर्गत प्रत्येकी चार शाखा काम पाहणार आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना पाण्यासह ओलिताखालील क्षेत्राच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण झाला आहे. या विभागाच्या माध्यमातून योजनेचे आवर्तन सुरू करणे, शेतकऱ्यांचे मागणी अर्ज जमा करणे, मोजणी करणे, आकारणी करणे, वसुली करणे ही सर्व कामे करावयाची आहेत.