शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सांगली जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा पाऊस कमीच बरसला, दुष्काळी तालुक्यात समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 12:21 IST

तलावांसह धरणांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

अशोक डोंबाळेसांगली : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा मोसमी पावसाचा हंगाम पूर्ण होत असताना जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत १७.६८ टक्के कमी पावसाची नोंद झाली. यंदाही सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात कोसळला असताना मिरज, जत, आटपाडीसह अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत आणि दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तलावांसह धरणांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.राज्यात मान्सून वेळेवर पोहोचला. त्यामुळे यंदा चांगलाच पाऊस बरसेल, असे वाटले होते. मात्र, मान्सून पोहोचून देखील जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती. गेल्या वर्षी जून २०२१ मध्ये जिल्ह्यात सरासरीच्या १५७ टक्के पाऊस झाला होता. जून २०२२ मध्ये जिल्ह्यात सरासरी १९८.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८४.९ मिलीमीटर पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत केवळ ४२.७ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत चक्क ११४.४ टक्के पाऊस कमी झाला.जुलै २०२१ मध्ये सरासरी १३५ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यापैकी ३२१.४ मिलीमीटर म्हणजेच २३७.२ टक्के पाऊस झाला होता. जुलै २०२२ मध्ये मात्र सरासरीच्या १०६.५ टक्केच पाऊस झाला असून १३०.७ टक्के कमी पाऊस झाला. ऑगस्ट २०२१ महिन्यात सरासरीच्या ५४.४ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट २०२२ मध्ये मात्र ९६.६ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ४२.२ टक्के जादा पाऊस झाला. सप्टेंबर २०२१ महिन्यात सरासरी १३८.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९१.८ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या ६६.२ टक्के पाऊस झाला.सप्टेंबर २०२२ या महिन्यात सरासरी १७१.७ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना २१५ मिलीमीटर पाऊस झाला असून, १२५.२ टक्के पाऊस झाला.सप्टेंबर महिन्यातही गतवर्षीपेक्षा चक्क १०५.५ टक्के जादा पाऊस झाला आहे. जून, जुलै महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. याची भरपाई परतीच्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात भरून काढली आहे. परंतु, परतीचा पाऊसही गतवर्षीच्या पावसाची बरोबरी करू शकला नाही. गतवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एकूण ६८८.८ मिलीमीटर तर यावर्षी एकूण ५८५.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्हात गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी १७.६८ टक्के पाऊस कमी झाला आहे.

परतीचा मान्सूनच भारीमान्सून पावसाने वेळेत हजेरी लावली. पण, जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ११४.४ टक्के तर जुलै महिन्यात १३०.७ टक्के कमी पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. परतीच्या मान्सूनने मात्र जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट २०२२ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४२.२ टक्के जादा तर सप्टेंबर २०२२ या महिन्यात सरासरीच्या १२५.२ टक्के पाऊस झाला असून, गतवर्षीपेक्षा चक्क १०५.५ टक्के जादा पाऊस झाला आहे. यामुळे मान्सून पेक्षा परतीच्या मान्सून पावसानेच जिल्ह्याला दिलासा दिला आहे.आटपाडी, कवठेमहांकाळला सर्वाधिक पाऊसआटपाडी, कवठेमहांकाळ तालुके नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात आहेत. या दोन्ही तालुक्यांतील पिके परतीच्या पावसावरच अवलंबून आहेत. पण, यावर्षी जुलैमध्ये सरासरीपेक्षा आटपाडी तालुक्यात ३२६.३ टक्के तर कवठेमहांकाळ तालुक्यात २५७.५ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत जुलै महिन्यात पडलेला विक्रमी पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक शिराळाचजिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वाधिक पाऊस हा शिराळा तालुक्यातच झाला आहे. तो म्हणजे, १२०९.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच सर्वात कमी पाऊस आटपाडी तालुक्यात ३९६.४ मिलीमीटर झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस