शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

सांगली जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा पाऊस कमीच बरसला, दुष्काळी तालुक्यात समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 12:21 IST

तलावांसह धरणांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

अशोक डोंबाळेसांगली : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा मोसमी पावसाचा हंगाम पूर्ण होत असताना जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत १७.६८ टक्के कमी पावसाची नोंद झाली. यंदाही सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात कोसळला असताना मिरज, जत, आटपाडीसह अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत आणि दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तलावांसह धरणांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.राज्यात मान्सून वेळेवर पोहोचला. त्यामुळे यंदा चांगलाच पाऊस बरसेल, असे वाटले होते. मात्र, मान्सून पोहोचून देखील जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती. गेल्या वर्षी जून २०२१ मध्ये जिल्ह्यात सरासरीच्या १५७ टक्के पाऊस झाला होता. जून २०२२ मध्ये जिल्ह्यात सरासरी १९८.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८४.९ मिलीमीटर पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत केवळ ४२.७ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत चक्क ११४.४ टक्के पाऊस कमी झाला.जुलै २०२१ मध्ये सरासरी १३५ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यापैकी ३२१.४ मिलीमीटर म्हणजेच २३७.२ टक्के पाऊस झाला होता. जुलै २०२२ मध्ये मात्र सरासरीच्या १०६.५ टक्केच पाऊस झाला असून १३०.७ टक्के कमी पाऊस झाला. ऑगस्ट २०२१ महिन्यात सरासरीच्या ५४.४ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट २०२२ मध्ये मात्र ९६.६ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ४२.२ टक्के जादा पाऊस झाला. सप्टेंबर २०२१ महिन्यात सरासरी १३८.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९१.८ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या ६६.२ टक्के पाऊस झाला.सप्टेंबर २०२२ या महिन्यात सरासरी १७१.७ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना २१५ मिलीमीटर पाऊस झाला असून, १२५.२ टक्के पाऊस झाला.सप्टेंबर महिन्यातही गतवर्षीपेक्षा चक्क १०५.५ टक्के जादा पाऊस झाला आहे. जून, जुलै महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. याची भरपाई परतीच्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात भरून काढली आहे. परंतु, परतीचा पाऊसही गतवर्षीच्या पावसाची बरोबरी करू शकला नाही. गतवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एकूण ६८८.८ मिलीमीटर तर यावर्षी एकूण ५८५.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्हात गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी १७.६८ टक्के पाऊस कमी झाला आहे.

परतीचा मान्सूनच भारीमान्सून पावसाने वेळेत हजेरी लावली. पण, जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ११४.४ टक्के तर जुलै महिन्यात १३०.७ टक्के कमी पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. परतीच्या मान्सूनने मात्र जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट २०२२ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४२.२ टक्के जादा तर सप्टेंबर २०२२ या महिन्यात सरासरीच्या १२५.२ टक्के पाऊस झाला असून, गतवर्षीपेक्षा चक्क १०५.५ टक्के जादा पाऊस झाला आहे. यामुळे मान्सून पेक्षा परतीच्या मान्सून पावसानेच जिल्ह्याला दिलासा दिला आहे.आटपाडी, कवठेमहांकाळला सर्वाधिक पाऊसआटपाडी, कवठेमहांकाळ तालुके नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात आहेत. या दोन्ही तालुक्यांतील पिके परतीच्या पावसावरच अवलंबून आहेत. पण, यावर्षी जुलैमध्ये सरासरीपेक्षा आटपाडी तालुक्यात ३२६.३ टक्के तर कवठेमहांकाळ तालुक्यात २५७.५ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत जुलै महिन्यात पडलेला विक्रमी पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक शिराळाचजिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वाधिक पाऊस हा शिराळा तालुक्यातच झाला आहे. तो म्हणजे, १२०९.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच सर्वात कमी पाऊस आटपाडी तालुक्यात ३९६.४ मिलीमीटर झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस