शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यांच्या दरातील वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू केलेले कडक निर्बंध आणि आठवडा बाजारासह इतर सर्व व्यवहार बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर या ...

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू केलेले कडक निर्बंध आणि आठवडा बाजारासह इतर सर्व व्यवहार बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर या आठवड्यात पुन्हा वाढले आहेत. खाद्यतेलाची आवक पुन्हा एकदा घटल्याने या आठवड्यात पुन्हा दर वाढले आहेत.

कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी आठवडा बाजारासह इतर बाजारपेठ बंद आहे. यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. फळभाज्यांच्या दरात पुन्हा वाढ होत प्रतिकिलो ८० रूपयांनी भाजी मिळत आहे.

चौकट

या आठवड्यात वांगी, दोडका, गवारी आदी भाज्या सरासरी ६० ते ८० रूपये प्रतिकिलोने मिळत आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. शेवग्यासह मेथी, पालक या भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजार बंद असले तरी घरोघरी जावून विक्रते भाज्यांची विक्री करत आहेत.

चौकट

तेलदराचा पुन्हा भडका

कडक निर्बंध आणि त्यामुळे वाहतुकीसह इतर नियमांमुळे किराणा सामानाच्या आवकेवर अडचणी येत आहेत. त्यात गेल्या महिनाभरापासून स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. सुर्यफूल आणि सरकी तेलाची आवक ‌ वाढली आहे.

चौकट

कडक निर्बंधांमुळे लागू असलेल्या अत्यावश्यक सेवांमध्ये फळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही ग्राहकांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे आवक कमीच आहे. या आठवड्यात आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातील आंब्याची आवक अद्यापही तुलनेने कमी आहे.

कोट

उन्हाळा वाढल्याने भाजीपाल्यांचे उत्पादन घटत चालले आहे. त्यात कोरोनामुळे बाहेरच्या मोठ्या बाजारपेठेतून मागणी वाढत असल्याने स्थानिक भाजीपाला कमी पडत आहे. या आठवड्यात दर पुन्हा वाढतील, असाच अंदाज आहे.

- सुभाष पाटील, भाजी विक्रेते

कोट

कडक निर्बंध असले तरी किराणा मालाची आवक होत आहे. मात्र, मागणीएवढी आवक होत नाही. परराज्यातून येणारा माल घटला आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा तेलाचे दर वाढले असले तरी गहू, तांदूळ, ज्वारीचे दर स्थिर आहेत.

- अनिल घोरपडे, व्यापारी

कोेट

आठवडा बाजार बंद असल्याने अडचणी येत आहेत. दारात येणाऱ्या भाजीपाल्याचे दर वाढीव आहेत. सगळे व्यवहार बंद असल्याने दर वाढल्याचे व्यापारी सांगतात. आता शासनानेच दर स्थिर ठेवून दिलासा द्यावा.

- कविता माने, गृहिणी