शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रअण्णांसमोर विरोधक हतबल!

By admin | Updated: June 11, 2015 00:25 IST

माणगंगा, सूतगिरणीवर वर्चस्व : सेना-भाजपला दुहीचा फटका

अविनाश बाड - आटपाडी -मागील महिन्याभरात आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना आणि बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी या दोन मोठ्या संस्थांच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले होते. अखेर या दोन्ही संस्थांवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली. आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत रंग आणला, पण माघार घेतली, तर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारांना मात्र सभासदांनी नाकारले. राजेंद्रअण्णांच्या या डबल धमाक्याने देशमुख गटाच्या विरोधकांची गोची झाली आहे. माणगंगा कारखाना स्थापनेपासून यंदा प्रथमच एवढी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपनेही पॅनेल उभे केले. उमेदवारी अर्जासोबत ऊस उत्पादक शेतकरी असल्याच्या पूर्ततेबाबत थेट उच्च न्यायालयापर्यंत काहींनी धाव घेतली. त्यामुळे यंदाची निवडणूक अभूतपूर्व होण्याची चिन्हे निर्माण झाली. शिवसेना आणि भाजप यांची युती शेवटपर्यंत झाली नाही. मात्र गोपीचंद पडळकर यांनी ‘एकला चलो रे’ म्हणत प्रचारसभांचा धडाका लावला.देशमुख गटाच्या विरोधात हे दोन गट एकत्र आले असते, तर कारखान्याच्या निवडणुकीनंतर एका गटाचे अस्तित्व संपुष्टात आले असते. राजेंद्रअण्णांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. त्यांना सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे यांनीही साथ दिली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा झाल्या. दुष्काळाचे वारंवार संकट येऊनही, प्रसंगी टँकरने पाणी आणून कारखाना चालविणाऱ्या राजेंद्रअण्णांना सभासदांनी निवडणुकीत साथ दिली.सूतगिरणीचीही यंदा प्रथमच निवडणूक झाली. भाजपच्या पडळकरांचे परिवर्तन पॅनेल आणि राजेंद्रअण्णांचे शेतकरी पॅनेल या दुरंगी सामन्यात देशमुख गटाने पुन्हा गुलाल उधळला. साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ वाचले असले तरी, सूतगिरणीच्या निवडणुकीत दोन उमेदवार वगळता इतरांचे ‘डिपॉझिट’ही जप्त झाले. या संस्थांच्या निवडणुकीत देशमुखांच्या पुढच्या पिढीतील हर्षवर्धन आणि दिग्विजय या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी या दुष्काळी भागातील संस्थांवर निवडणुकीच्या खर्चाचा बोजा नको, म्हणून सामोपचाराने बिनविरोध निवडणुका करण्याचा कल असलेल्या राजेंद्रअण्णांनी निर्विवाद विजय मिळविला. असे असले तरी, या प्रस्थापितांशी कसलीही तडजोड न करता ठामपणे निवडणुकांना सामोरे जाणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमुळे तालुक्याच्या राजकीय संघर्षात वाढ झाली, एवढे मात्र नक्की. तालुक्यात आलेल्या ‘टेंभू’च्या पाण्यामुळे तालुक्याबरोबर साखर कारखान्याच्या उसाचा दुष्काळही कायमचा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखाना आणि सूतगिरणीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.