शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

शर्यत बंदी विरोधातील मोर्चा अडवला

By admin | Updated: April 16, 2015 00:05 IST

घटनास्थळी निवेदन स्वीकारले : जिल्ह्यातील शर्यत शौकिनांचा सहभाग

सांगली : बैलगाडी शर्यतीवरील बंदीमुळे जातीवंत बैलांच्या प्रजाती नष्ट होत असून, ग्रामीण भागातील उत्सवामधील शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा खेळ नष्ट होत आहे. यासाठी शर्यतीवर असलेली बंदी उठवण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी सांगलीत बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुरुवातीलाच पोलिसांनी अडवून त्याला परवानगी नाकारली. मोर्चामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही परवानगी नाकारल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विश्रामबाग चौकातच जिल्हा प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शिराळा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी केले.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून शर्यतीसाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्याबरोबर कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवरील शर्यतशौकीन, बैलगाडीचालक, मालक आदी मोठ्यासंख्येने आले होते. सुमारे चारशेहून अधिक बैलगाडीचालक बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच पोलिसांनी सकाळी अकरा वाजता विश्रामबाग चौकातच मोर्चा अडवला. पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक धनंजय भांगे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे आदींनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. विश्रामबाग चौक ते पुष्कराज चौक रस्त्याची दुरुस्ती सुरु असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिताही सुरू आहे.
शहरामध्ये मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी होणार असून, मोर्चा स्थगित करण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली. काही वेळ झालेल्या वादावादीनंतर विश्रामबाग चौकातच जिल्हा प्रशासनाने निवेदन स्वीकारावे, असे ठरले. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार किशोर घाटगे यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडी शर्यत बंदीमुळे जातीवंत बैलांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. ग्रामीण भागातील उत्सव, उरूस, यात्रामधील मनोरंजनाचा खेळ बंद होत आहे. अनाधिकालापासून चालत आलेल्या चाली, रूढी बंद होत आहेत. यासाठी शर्यत संहिता बनवून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी.
आंदोलनामध्ये धनाजी पाटील, विजय शिंदे, जयपाल कोळी, पप्पू संकपाळ, दिलीप बंडगर, भारत गायकवाड, शहाजी दुधाळ, चारुदत्त चौगुले, बाळासाहेब डुबल आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

सांगलीत तीन तास वाहतुकीची कोंडी
मोर्चासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शर्यतशौकीन बैलगाडीसह आले होते. बैलगाड्यांची रांग विश्रामबाग चौक ते लक्ष्मी मंदिर चौकापर्यंत लागली होती. यामुळे या रस्त्यावर सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी होती. सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत बैलगाड्या थांबून होत्या. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर दुपारी बैलगाडीचालक परतले.