शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कुजलेली द्राक्ष घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 16:08 IST

कर्जमाफीसह एकरी लाख रुपये मदत देण्यासाठी आंदोलन

तासगाव : राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानीने द्राक्ष बागांसह शेतीच्या नुकसानीची व्यथा मांडली. मात्र शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार सुमनताई पाटील, आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी कुजलेली द्राक्ष घेऊन नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करून द्राक्षबागांना एकरी लाख रुपये भरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू, असा इशारा यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिला.आमदार सुमनताई पाटील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडत आहेत. मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही. एनडीआरएफ निकषानुसार चारपट मदत सरकारने तात्काळ द्यायला हवी. मात्र सरकार केवळ घोषणा करत आहे. द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना भेटूच; पण कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून त्याच्यावर ठोक असा निर्णय घेण्याची त्यांना विनंती करू. विनंतीला मान दिला नाही, तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. आमदारकीपेक्षा लोकांचं हित महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे करायला लागेल ते करू, असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला.

सलग तीन वर्ष अडचण असेल तर शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे. पिकवलेला माल कुजल्यामुळे त्याची किंमत होत नाही. अशा द्राक्षाला कुठे एक रुपया सुद्धा मिळणार नाही, त्यामुळे लोकांनी द्राक्षबागा काढण्याचा विचार केला आहे. द्राक्ष बागायतदारांना मदत होत नसेल तर आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत.

गेल्या वर्षीची मदत अजून मिळाली नाही. द्राक्ष पिकात सर्वाधिक गुंतवणूक होते. त्यात नुकसान झालं तर मदत द्यायला हवी. मात्र पंचनामे अजिबात झालेले नाहीत. पंचनामे झाले म्हणून सत्ताधारी नेत्यांकडून खोटं सांगितलं जात आहे, अशी टीका आमदार पवार यांनी यावेळी केली.

या मागण्यांसाठी ठिय्या

  • द्राक्ष उत्पादकांचे सर्व कर्ज माफ करून एकरी एक लाख रुपये मदत करावी.
  • द्राक्ष घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा बनवावा.
  • द्राक्षास १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या काळातील पिक विमा लागू करावा. जाचक अटी रद्द करून भरपाईच्या रकमेत वाढ करावी.
  • सरसकट पंचनामे करावेत.
टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन