शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नारळ फुटण्याअगोदरच सांगलीत प्रचाराचा धुरळा

By admin | Updated: September 30, 2014 00:16 IST

विधानसभा निवडणूक : प्रचार प्रारंभाची केवळ औपचारिकता

सांगली : पक्षीय प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचे रान उठविले आहे. सुरुवातीला महापालिका क्षेत्र वगळून अन्य १२ गावांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मतदारांच्या गाठी-भेटीवर अधिक भर देण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाची प्रचार प्रारंभ सभा होणार असून, ती केवळ एक औपचारिकता ठरणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सध्या महापालिका क्षेत्रासह चारही बाजूच्या छोट्या गावांचा समावेश आहे. यामध्ये नांद्रे, बिसूर, माधवनगर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, खोतवाडी, वाजेगाव, बामणोली, इनाम धामणी, अंकली, हरिपूर या गावांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्र मोठे असल्याने याठिकाणी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा धडाका दिसणार आहे. कॉँग्रेसचे मदन पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी ग्रामीण भागात प्रचार सुरू केला आहे. या गावांमध्ये जाऊन लोकांच्या भेटी-गाठीचा कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक पक्षामार्फत आता प्रचार प्रारंभाच्या सभेचे नियोजन सुरू आहे. राष्ट्रवादीने सभेचे नियोजन केले आहे. कॉँग्रेसच्याही सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. भाजप, शिवसेनेचीही त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत या सभा येत्या आठवडाभरात होणार आहेत. प्रचाराचा नारळ फुटण्याआधीच प्रचाराचा धुरळा उठल्याने आता सभांची केवळ औपचारिकता बाकी आहे. यंदाच्या सांगली विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे प्रचारावरही त्याचा परिणाम होत आहे. संभाजी पवार, पृथ्वीराज पवार व गौतम पवार यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे कमळाऐवजी धनुष्यबाणाचा प्रचार करताना त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. म्हणूनच पवार समर्थकांनी सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा जोर लावला आहे. राष्ट्रवादी प्रथमच या मतदारसंघात मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांनाही या सर्व भागात नव्याने प्रचाराची यंत्रणा राबवावी लागणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांना महापालिकेच्या निवडणुकीचा अनुभव होता. आता आमदारकीची निवडणूक लढविताना त्यांना मोठी यंत्रणा लावावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रात या गोष्टी नंतर करता येतील, या विचाराने सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघातील ग्रामीण भागाला सध्या प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)