शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक लॉबीचा जीएम चाचण्यांना विरोध

By admin | Updated: August 9, 2015 00:47 IST

अजित नरदे : शेतीच्या विकासासाठी चाचण्या आवश्यक

सांगली : प्रदीर्घ विचारमंथन करून, विरोधकांच्या सर्व आक्षेपांचे निरसन करून राज्य शासनाने सुरु केलेल्या जनुक बदल (जीएम) वाणांच्या संरक्षित शेतचाचण्या स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यामागे शेती आणि जैव तंत्रज्ञानाची काहीही माहिती नसणाऱ्या मान्यवर व्यक्ती व कीटकनाशके विक्री करणाऱ्या लॉबीचा हात आहे. शेतीच्या विकासासाठी या चाचण्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अजित नरदे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने सर्वांगीण विचार करुन, जनुक बदल वाणांची चाचणी करावी, अशी शिफारस महाराष्ट्र शासनाला केली होती. या शिफारशीनंतर चाचण्यांना परवानगीही मिळाली होती. तथापी शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान मिळाले, तर कीटकनाशक खपात प्रचंड घट होऊन नुकसान होण्याची भीती असल्याने कीटकनाशक लॉबीने याला विरोध केला, म्हणून याला स्थगिती मिळाली. जैव तंत्रज्ञान व शेतीशी काहीही संबंध नसलेल्या पर्यावरणवाद्यांना पुढे करून चाचण्यांना विरोध करण्यात येत आहे. ते म्हणाले की, श्रीमती दिलनवाय वारिअवा या मुंबईतील व्यावसायिकांचा शेतीशी संबंध नसताना, काही मान्यवर मंडळींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या चाचण्यांना बंदी घालण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी यावर बंदी आणली आहे. या शिष्टमंडळामध्ये युजीसीच्या माजी अध्यक्षा श्रीमती अरमैत्य देसाई, डॉ. असद रहमानी, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सुजाता मनोहर, माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, माजी मुख्य सचिव व्ही. रंगनाथन् आदींचा समावेश होता. यावेळी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, जिल्हाध्यक्ष शीतल राजोबा, अनिल पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शेतीचा विकास खुंटणार ऐन खरिपाच्या तोंडावर चाचण्या थांबविण्यात कीटकनाशक लॉबी यशस्वी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास आणखी एक वर्ष विलंब होणार आहे. त्यामुळे शेतीचा विकास पुन्हा खुंटणार आहे. त्यामुळे जीएम वाणांच्या चाचण्या सुरू कराव्यात.