शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा विश्वास कारखान्याचे खासगीकरण

By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST

मानसिंगराव नाईक : वार्षिक सर्वसाधारण सभेत इशारा; शासनाच्या धोरणाबाबत नाराजीचा सूर

शिराळा : सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणणे, कारखान्यांची प्रगती रोखणे, चांगले काम करू न देणे अशा शासनाच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघण्यास वेळ लागणार नाही. आता काळाची गरज ओळखून सभासदांचे हक्क अबाधित ठेवून सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्यादृष्टीने पावले उचलावी लागतील, असा इशारा विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी दिला.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे कारखान्याच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सर्जेरावदादा बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, बाबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष नाईक म्हणाले की, केंद्र सरकारने याअगोदर साखर दर ३२५० रुपये धरून एफआरपी काढली आणि आता दर २००० रुपयांपर्यंत आहेत. मग केंद्र शासनाने हा मधील फरक अनुदान म्हणून द्यावा. शासनाने कारखान्यांना १५ हजार कोटी दिले आहेत. ते अनुदान नसून कर्ज आहे. त्यामुळे ही कर्जफेड पुढील वर्षापासून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातूनच जाणार आहे. शासनाने कर्जाऐवजी अनुदान द्यावे.ते म्हणाले की, आज विश्वास कारखाना स्वनिधीतून आधुनिकीकरण, डिस्टिलरी प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी परवानगी मागत आहे. मात्र शासन त्याला परवानगी देत नाही. यामध्ये कारखानदारीबरोबर चाळीस हजार शेतकरी अडचणीत येणार आहेत. शासनाचे असेच धोरण राहिले तर, काळाची गरज ओळखून सभासदांचे हक्क अबाधित ठेवून कारखान्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. कोणताही निर्णय शेतकरी सभासदांच्या परवानगीनेच घेतला जाईल. गेल्या १५ वर्षांत १५१ कोटींची गुंतवणूक करून १२५० टन क्षमतेचा कारखाना चार हजार टन ऊस गाळप क्षमतेचा झाला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २१ कोटींची वीज यावर्षी विकली जाणार आहे. हा प्रकल्प येत्या चार वर्षात कर्जमुक्त होईल.यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील, अमरसिंह नाईक, दिनकरराव पाटील, रणजितसिंह नाईक, विराज नाईक, विलासराव पाटील, युवराज गायकवाड, विश्वास कदम, भीमराव गायकवाड, राजेंद्रसिंह नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण, संजय नाईक, अरुण साळुंखे, प्रमोद नाईक, दिनकर महिंद, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. संचालक विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांनी अहवाल वाचन केले. अभिमन्यू निकम, अशोक कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)इतर कारखान्यांच्या दराशी तुलनायावेळी माजी संचालक पी. के. पाटील यांनी इतर कारखाने किती जादा देतात, असा प्रश्न उपस्थित केला. यास उत्तर देताना अध्यक्ष नाईक यांनी, शिवाजी केनने पहिल्यांदा दोन हजार, नंतर एक हजार दर दिला. उदय कारखान्याने पहिले दोन महिने २४०० रुपये दिले. नंतर किती दर दिला, रयतने किती पैसे दिले, ते संबंधित ऊस घालणाऱ्यांना विचारा म्हणजे समजेल. आपण सर्व उत्पादकांना एकच दर शेवटपर्यंत दिला आहे. आॅक्टोबरमध्ये ३१६ रुपयांचा हप्ता वर्ग करणार आहे. त्यामुळे २४१६ रुपये दर विश्वास कारखाना देणार आहे.यावेळी डॉ. निवृत्त महिंद यांनी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना खासगी करावा, असा ठराव मांडला. त्यास बळवंत पाटील यांनी अनुमोदन दिले.