शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आता एकच मिशन, शेतकऱ्यांना पेन्शन

By admin | Updated: July 6, 2014 00:01 IST

आर. आर. पाटील : बळिराजाला मिळणार न्याय

कवठेमहांकाळ : आयुष्यभर शेतीत काबाडकष्ट करून देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन देण्यासाठी आपण राज्यात व्यापक मिशन राबवून न्याय देणार आहोत. ‘आता एकच मिशन, शेतकऱ्यांना पेन्शन’, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, शनिवारी येथे केली.
गृहमंत्री पाटील कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, शेती देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. या शेतीवर देशातील कोट्यवधी लोक उपजीविका करतात; परंतु शेतीत राबणारा शेतकरी मात्र हलाखीचे व गरिबीचे जीनव जगत आहे. उतारवयात कुटुंबात सांभाळ होत नसल्याने या शेतकऱ्याचे जीवन उघड्यावर पडते. त्यामुळे पुढच्या काळात राज्यातील शेतकरी हलाखीचे जीवन जगू नये, त्याचा उत्तरार्थ सुखाचा जावा, यासाठी त्याला वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन देण्यात यावी, याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, यासाठी आटपाडी तालुक्यात आबा सरगर नावाच्या शेतकऱ्याने उपोषण सुरू केले आहे. त्यांची ही व्यथा राज्य सरकारकडे मांडून ही मोहीम सार्थ करून दाखवू. १९९४ मध्ये आपण शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी आवाज उठविला होता. तो तडीस नेण्याची आज संधी मिळाली आहे. ती सार्थ करून दाखवू असेही ते म्हणाले. (वार्ताहर)