शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पॅनेलवरील सचिव नियुक्तीअभावी नवे उपक्रम ठप्प

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

स्वच्छ कारभाराची गरज : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नियमांचे दुखणे

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल ४२ कोटींच्या घरात असतानाही अद्याप याठिकाणी पॅनेलवरील सचिव नियुक्ती मात्र करण्यात आलेली नाही. प्रशिक्षित, मान्यताप्राप्त सचिवांची नियुक्ती रखडल्याने नवीन उपक्रम मात्र ठप्प झाले आहेत. स्वच्छ व कायदेशीर कारभारासाठी पॅनेलवरील सचिव नियुक्तीची मागणी होत आहे. प्रशिक्षित सचिव पॅनेल जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयार झाले आहेत, ते बाजार समित्यांमध्ये नियुक्त करण्यात यावेत, असे आदेश यापूर्वीच केंद्र शासनाने दिला आहे. या पॅनेलमधूनच सचिवांची नियुक्ती करण्यात यावी, हे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. सांगलीसह ३५ बाजार समित्यांवर पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी अपात्र सचिवांची नियुक्ती केली आहे. सांगली बाजार समितीच्या यापूर्वीच्या सचिवांची नियुक्ती कायम करण्यात यावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठराव करून तो पणन मंडळाकडे पाठविला होता. तो मंजूर झाल्याने यापूर्वीच्याच सचिवांची नियुक्ती कायम झाली आहे. यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तरुण, प्रशिक्षित व मान्यताप्राप्त सचिवांपासून वंचित राहिला आहे. बाजार समितीमध्ये दोन वर्षांपूर्वी ४० ते ५० लाखांचा अपहार झाला होता. लेखापरीक्षणामध्ये ही बाब स्पष्ट झाल्यानंतर यामधील काही रकमाही भरून घेण्यात आल्या आहेत. दोषी दोघा कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी दोषी धरून शासनाने सांगली बाजार समितीच बरखास्त करून यावर प्रशासक नेमला आहे. येत्या जानेवारीला प्रशासक नेमून दोन वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या कालावधीसाठी पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त झाला आहे. मान्यताप्राप्त सचिवांच्या ताब्यात संस्था असती तर कदाचित हा गैरव्यवहार टळला असता. पॅनेलवरील सचिव नसल्यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रमांपासून समिती मुकली आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना, प्रबोधन शिबिरेही राबवली जात नाहीत. यामुळे नव्या योजनांपासून शेतकरी वंचित रहात आहेत. कायद्याच्या कलमांमध्ये बदल करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सचिवांच्या नेमणुकांचे अधिकार पणन खात्याने हाती घ्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)केवळ सेस गोळा करण्याचे काम सध्या बाजार समितीकडून केवळ सेस गोळा करणे व तो खर्च करणे इतकेच काम होत आहे. नव्या उपक्रमासाठी प्रशिक्षित व तोट्यातून बाहेर काढणाऱ्या सचिवांची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांना नव्या योजनांचा लाभ देण्याची गरज निर्माण झाली आहे. सांगली कृषी बाजार समिती ‘अ’ गटात आहे. त्यामुळे याठिकाणी स्पर्धा परीक्षा देऊन निवड झालेला सचिव नियुक्त करणे आवश्यक आहे. अभ्यासू उपनिबंधक दर्जाचा अधिकारी नियुक्त झाल्यास होणारे गैरव्यवहार टळतील शिवाय समितीचा कारभार कायदेशीर बाबी सांभाळून होईल. त्याचबरोबर शेतकरी, व्यापाऱ्यांना नव्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ मिळण्यास मदत होईल. - प्रकाश जमदाडे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली