शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांची कंपूशाही मोडीत काढण्याची गरज

By admin | Updated: March 30, 2015 00:17 IST

अरूण गोडबोले : सांगलीत ‘वसंतायन’चे प्रकाशन

सांगली : मराठी साहित्य विश्वातील साहित्य परिषद आणि मंडळे ही केवळ प्रसिध्दीच्या मागे लागल्याचे चित्र असून, भविष्यकाळात साहित्यिकांची कंपूशाही मोडीत काढणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले यांनी आज रविवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत केशव पाटील यांच्या पन्नास वर्षीय वाड्:मयीन सेवेचा मागोवा घेणाऱ्या ‘वसंतायन’ या सन्मानग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राजमती भवन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार शरद पाटील आणि साहित्यिक तारा भवाळकर यांच्याहस्ते प्रा. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अरुण गोडबोले म्हणाले, अनेक चांगली पुस्तके निर्माण होत असली तरी दुर्देवाने कित्येकांची वितरण व्यवस्था सक्षम नसते. परिणामी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी याचा फटका संबंधित पुस्तकांना बसतो. साहित्य परिषद आणि मंडळे यांना जे अनुदान मिळते त्याचाही विचार शासनाकडून होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. वसंत केशव पाटील यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. वाचकांनीही लेखकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि
सकस साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी विकत घेऊन पुस्तके वाचनाची सवय लावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. वसंत केशव पाटील यांनी, जीवनाच्या प्रवासात अनेक बरे - वाईट अनुभव आल्यानेच मला खूप काही शिकता आले. महत्त्वाचे म्हणजे शब्दांनी मला लेखनाचे बळ दिले असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा. पाटील यांनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांचा मागोवा घेतला. प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी, समोरच्या व्यक्तीची पर्वा न करता निर्भिडपणे मत व्यक्त करणारा साहित्यिक म्हणून प्रा. वसंत केशव पाटील यांची साहित्य क्षेत्रात ओळख असल्याचे
सांगितले.
याप्रसंगी महावीर जोंधळे, सुनीता पवार, प्रा. जी. के. ऐनापुरे, प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. अविनाश सप्रे, महेश कराडकर, डॉ. अनिल मडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

परभाषेत अनुवाद हवा
अरूण गोडबोले म्हणाले की, दर्जेदार मराठी साहित्य निर्माण होत असून, त्याचा इतर परभाषेत अनुवाद होण्यासाठी शासनाने प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. यामुळे मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावतील.