शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-मिरज रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांसाठी मुहूर्त अखेर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

सांगली ते मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता व सौंदर्य वाढले आहे. लोकमत ...

सांगली ते मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता व सौंदर्य वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अनेक अपघात आणि वाहनचालकांच्या तक्रारींची रीघ याची दखल घेत अखेर सांगली-मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी सुमारे १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काही ठिकाणी लाल रंगाचे रिफ्लेक्टरही बसविले जाणार आहेत, त्यामुळे रस्त्याचे सौंदर्यही वाढणार आहे.

सध्या काम गतीने सुरू आहे. वाहनांची संख्या कमी झाल्यानंतर रात्रीच्या वेळी पट्टे मारले जात आहेत. सांगली-मिरजदरम्यान २६ ठिकाणी गतिरोधक आणि झेब्रा पट्टे रंगविले जात आहेत. विशेषत: गतिरोधकांना प्राधान्य देण्यात आले आहे. विश्रामबाग, भारती रुग्णालय, विजयनगर आदी ठिकाणी झेब्रा पट्टे रंगविले जात आहेत. यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढले आहे, शिवाय तो सुरक्षितही झाला आहे.

विश्रामबाग ते सांगलीदरम्यान गतिरोधकांमध्ये लाल रंगाचे रिफ्लेक्टरही बसविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रात्री वाहनाचालकांना ते ठळकपणे नजरेत येतील. हा रस्ता बहुतांश वेळा अंधारात बुडालेला असतो. पथदिवे बंदच असतात. काही ठिकाणी गर्द झाडीमुळेही रस्त्यावर प्रकाश पडत नाही. अशावेळी रिफ्लेक्टर वाहनचालकांना सतर्क करण्याचे काम करतील.

चौकट

अपघातांमध्ये लाखोंची वित्तहानी

सांगली-मिरज रस्त्यावरील गतिरोधक लक्षात न आल्याने अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. कृपामयीजवळ गतिरोधक लक्षात न आल्याने वेगातील दोन कंटेनर परस्परांवर आदळून खूपच मोठी हानी झाली होती. भारती रुग्णालय, वालचंद महाविद्यालय, वानलेसवाडी येथील गतिरोधक अजिबात लक्षात न आल्याने अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. पट्टे मारल्याने अपघातांना आळा बसणार आहे.

चौकट

१०० मीटर अंतरात पाच गतिरोधक

मिरजेत शास्त्री चौक ते नदीवेस हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी नव्याने करण्यात आला. बांधकाम विभागाने रहिवाशांच्या सुरक्षिततेची जरा जास्तच काळजी घेतली. अवघ्या १०० मीटर अंतरात तब्बल पाच गतिरोधक बसविले. त्यामुळे वाहनांना हा रस्ता पार करणे म्हणजे दिव्यच ठरत आहे. कोणताही शास्त्रशुद्ध विचार न करता अधिकाऱ्यांनी मनमानीपणे गतिरोधक बसवले आहेत. त्याच्यावर पट्टेही मारले नाहीत.