शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’ची सभा बिलावर गाजणार

By admin | Updated: September 30, 2015 00:08 IST

=शेतकऱ्यांच्या ३२ कोटींचे काय?: कामगारांच्या थकित पगाराचा प्रश्नही निर्माण होणार

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ आणि २०१४-१५ या गळीत हंगामातील ३२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकित आहेत. तसेच कामगारांच्या थकित पगाराचाही प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर बुधवार, दि. ३० रोजी होणारी सभा गाजणार आहे. कारखाना प्रशासनाने हे ओळखूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांपूर्वी काही पैसे जमा केले आहेत. परंतु, ती रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे शेतकरी व सभासद प्रशासनाला थकित रकमेवरून धारेवर धरणार आहे.वसंतदादा साखर कारखान्याच्या बिलाचा प्रश्न दोन वर्षांपासून गंभीर निर्माण झाला आहे. २०१३-१४ वर्षामध्ये ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची ३४ कोटी थकबाकी होती. त्यापैकी वीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित जवळपास १४ कोटींची बिले शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाहीत. २०१४-१५ या गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचे १७ कोटींचे बिल थकित आहे. या शेतकऱ्यांनी थकित बिल मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात आंदोलन केले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत बिल देण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत. पण, ती रक्कम तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तर केवळ एक हजार रुपयेच जमा झाले आहेत. थकित बिलावरून शेतकरी व सभासद कारखाना प्रशासनास जाब विचारण्याची शक्यता आहे.वसंतदादा कारखान्यातील कामगारांची थकबाकीही चाळीस कोटींहून अधिक आहे. कामगारांच्या पगाराचा प्रश्न कसा सोडविणार आहे, असाही सभासदांकडून प्रश्न उपस्थित होणार आहे. (प्रतिनिधी)धडक योजनेच्या पाणीपट्टीचा प्रश्नवसंतदादा कारखाना धडक पाणी योजना चालवत आहे. या योजना कालबाह्य असल्यामुळे पाणीपट्टी आणि योजनेचा खर्च भागत नाही. वाढीव खर्च कारखाना भरत असल्यामुळेही आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. यातूनही धडक योजनेवर ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी अन्य कारखान्यास ऊस घालवणार असाल तर घालवा, पण धडक योजनेची पाणीपट्टी प्रामाणिकपणे भरली पाहिजे. तुम्ही अन्य कारखान्याला ऊस घालणार असाल तर वसंतदादा कारखान्याने धडक योजनांच्या पाणीपट्टीचा वाढीव खर्च कशासाठी सोसायचा, असा प्रश्नही वसंतदादा कारखाना प्रशासनाने उपस्थित केला आहे.