शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान तीनशे कोटी, मिळाले २0 कोटी

By admin | Updated: March 30, 2015 00:18 IST

८० लाख परत : गतवर्षातील स्थिती, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

सांगली : गतवर्षात अवकाळी पावसाने द्राक्षे, बेदाणा, डाळिंब बागांसह इतर पिकांचे तीनशे कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असताना, शासनाकडून १९ कोटी ९९ लाख ८५ हजारांचे वाटप करण्यात आले. यामधील ८० लाख रुपये परत गेले असून, याचा लाभ २३ हजार ८०० शेतकऱ्यांना झाला आहे.सांगली जिल्ह्यामध्ये २०१३-१४ मध्ये अतिवृष्टी व गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. पाच ते सहा वेळा झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याचे वेळोवेळी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. पंचनामे केवळ नजरअंदाजाने करण्यात आले, प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे झाले नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. राज्यात आघाडी सरकार होते. सांगली जिल्ह्यातील मंत्र्यांचा राज्य शासनामध्ये चांगला दबाव असल्यामुळे व त्याचबरोबर मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री डॉ. पतंगराव कदम सांगली जिल्ह्याचे असल्यामुळे अवकाळीग्रस्तांसाठी तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. नुकसानीपोटी २१ कोटी ५१ लाख ३७ हजारांची मदत सांगली जिल्ह्याला वेळोवेळी प्राप्त झाली. यामधील या वर्षात १९ कोटी ९९ लाख ८५ हजारांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले. यामधील ८० लाख रुपये विविध कारणांमुळे परत गेले. यामध्ये बँक खाते नसणे, लाभार्थी नसणे, नुकसान सिध्द झालेले नसणे आदी कारणे आहेत.
गतवर्षात महसूल व शेती विभागाकडून झालेले नुकसानीचे पंचनामे केवळ नजरअंदाजाने करण्यात आले, प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनी शेतीला भेट दिली नाही, अशा अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. द्राक्षे, बेदाणा व डाळिंबासह रब्बी पिकांचे तीनशे कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत शेतकरी संघटनांनी तशा भरपाईची मागणीही शासन व प्रशासनाकडे केली होती. मदतीचे वाटप टप्प्या-टप्प्याने झाल्याने या नुकसानीबाबत नंतर तक्रारी झाल्या नाहीत. (प्रतिनिधी)

तीन कोटी रुपये प्राप्त
२०१४ च्या डिसेंबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी तीन कोटी २७ मार्च रोजी प्रशासनाला प्राप्त झाले. या दोन महिन्यात सुमारे २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी चार कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले असून, त्यापैकी तीन कोटी रुपये आता प्राप्त झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.