शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली ते पेठ रस्त्याबाबत जयंतरावांनी व्यक्त केली दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST

सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत ...

सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील हा रस्ता असला तरी अधिकाऱ्यांना रस्तेदुरुस्तीसाठी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.

जयंत पाटील यांनी रविवारी दुपारी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पेठ ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे म्हणजेच केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता मुरूमसुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने डांबरीकरण करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

जयंत पाटील यांनी याप्रश्नी दखल घेतल्याबद्दल नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी त्यांना धन्यवाद दिले. साखळकर म्हणाले की, पालकमंत्री म्हणून त्यांनी या प्रश्नाची दखल घेतली आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हे काम पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. महाराष्ट्रातील एक मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी तसेच भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पक्षीय अभिनिवेश न बाळगता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून चौपदरीकरण होईपर्यंत थांबू नये, अशी अपेक्षा आहे.

चौकट

‘लाेकमत’कडून प्रकाशझोत

सांगली ते पेठ रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळे होणारे नागरिकांचे, वाहनधारकांचे हाल व यावर मौन बाळगलेले राजकारणी यांविषयी प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

चौकट

भाजप नेते गप्पच

राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाबाबत भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे. पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत हा विषय नसतानाही त्यांनी याची दखल घेतली. भाजपला या प्रश्नाची दखल घ्यावीशी वाटत नाही का, त्यांना या रस्त्यावर होणारे जनतेचे हाल दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.