शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांची प्रत्येक फेरीत आघाडी

By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST

विधानसभा निवडणुकीत सलग सहाव्यांदा विजय

इस्लामपूर : निवडणुकीच्या राजकारणातील महागुरु जयंत पाटील यांनी आपला सलग सहावा विजय शानदारपणे साजरा केला. इथली निवडणूक तशी निस्तेजच राहिली. त्यामुळे मतमोजणी केंद्रातील यंत्रणाही केवळ मतमोजणीची औपचारिकता पार पाडत होती. जयंतरावांच्या प्रत्येक फेरीतील निर्णायक आणि निर्विवाद आघाडीने इथे कसलाही ताण— तणाव नव्हता. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात इथली मतमोजणी झाली.सकाळी ८ वाजता येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा निकाल अवघ्या १५ मिनिटात बाहेर आला आणि जयंत पाटील यांनी पहिल्या फेरीतच ४ हजार ७२६ मतांची आघाडी घेतली. जयंत पाटील यांनी ६ फेऱ्यामंध्ये ४ हजार, तर चार फेऱ्यात ५ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या अभिजित पाटील यांनी १५ फेऱ्यांमध्ये आपले दुसरे स्थान कायम ठेवले. काँग्रेसचे जितेंद्र पाटील पहिल्या सुरुवातीच्या पाच फेऱ्यात दुसऱ्या स्थानावर राहिल्याचे स्पष्ट झाले.जयंत पाटील यांच्या प्रत्येक फेरीतील वाढत्या मताधिक्यामुळे मतमोजणीचे कामही सुरळीतपणे झाले. चौथ्या फेरीत जितेंद्र पाटील यांनी जयंत पाटील यांचे मताधिक्य १ हजार ६५९ मतांवर आणले. या फेरीत जितेंद्र पाटील यांना मानणाऱ्या बोरगावसह परिसरातील गावांचा समावेश होता. तसेच अभिजित पाटील यांनी २0 व्या फेरीत मिरज मंडलातील गावांचा समावेश असलेल्या मतदान केंद्रावर चांगली मते मिळविल्याने जयंतरावांचे या फेरीतील मताधिक्य केवळ १ हजार २५ इतकेच राहिले. फक्त दोन फेऱ्यातच त्यांचे मताधिक्य हजाराच्या आसपास रोखण्यात विरोधी उमेदवारांना यश आले. (वार्ताहर)राज्यात भाजप लाटेचा राष्ट्रवादीला फटकाराज्याच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी आवश्यक ती भूमिका घेईल. प्रमुख पक्षांनी २८८ जागांवर उमेदवार उभा करुन आपापली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला. भाजप लाटेचा आमच्या पक्षाला फटका बसला आहे. जनतेचे माझ्यावर पूर्वीइतकेच प्रेम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेवढे मताधिक्य जास्त, तेवढी जबाबदारी जास्त, हे ओळखून मतदारसंघाचा विकास करणार आहे.- जयंत पाटील, राष्ट्रवादी विजयी उमेदवार.प्रचारास वेळ मिळाला नाहीइस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात लाट होती. परंतु एकास एक उमेदवार देण्यात आम्ही अपयशी ठरलो. प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळेच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. जनतेचा कौल मान्य आहे. - अभिजित पाटील, अपक्ष उमेदवार.जनतेचा कौल मान्यपक्षाच्या आदेशाचा सन्मान ठेवून मी उमेदवारी स्वीकारली, लढलो. निवडणुकीत यश—अपयश हे ठरलेलेच आहे. येथून पुढे जे पक्षापासून दुरावलेले आहेत, त्यांना एकत्र करुन मतदारसंघात काँग्रेसला ताकद देणार आहे. -जितेंद्र पाटील, काँग्रेस उमेदवार.