शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाविकास आघाडीचे गणित सांगलीमध्ये जुळणार कसे?, जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 18:38 IST

सांगली विधानसभा मतदारसंघात विरोधी काँग्रेसने गेल्या दोन वर्षांपासून जोरदार तयारी

सांगली : सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या सांगलीविधानसभा मतदारसंघात विरोधी काँग्रेसने गेल्या दोन वर्षांपासून जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनीही गेल्या दोन वर्षांत अनेकदा या मतदारसंघातून लढण्याची भूमिका मांडल्याने महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांमधूनच शंका उपस्थित केली जात आहे.सांगली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरते. मागील निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये झालेली काट्याची लढत राज्यभर चर्चेची ठरली होती. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा निसटता पराभव झाला. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे ताकदीचे उमेदवार असल्याने येथील लढत एकतर्फी होईल, असा अंदाज भाजपच्या नेत्यांनी बांधला होता. या अंदाजाला मोठे तडे गेले होते.काट्याच्या लढतीमुळे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. पुढील निवडणुकीतील दावेदारी भक्कम करीत पाटील व त्यांच्या समर्थकांनी सतत राजकारणात सक्रिय राहण्यास प्राधान्य दिले. दुसरीकडे भाजपनेही तेवढीच तयारी केली आहे.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेस उमेदवाराला चांगली साथ दिली, मात्र काँग्रेसअंतर्गत गटबाजीची चर्चा निवडणुकीनंतर सुरु झाली. राज्यभर या गटबाजीचा गवगवा झाला. काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा प्रश्न कायम असून राष्ट्रवादीच्या दावेदारीचा अडथळाही काँग्रेसला वाटू लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीचे गणित सांगलीत कसे जुळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जयंतरावांच्या भूमिकेकडे लक्षकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यालयास जयंत पाटील यांनी भेट दिल्याने महाविकास आघाडीच्या समीकरणांची चर्चा सुरू आहे. तरीही ऐनवेळी निवडणुकीत राष्ट्रवादी काय करेल, याचा अंदाज नसतो, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे. तसा अनुभवही त्यांना अनेकदा आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील