शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘करेक्ट कार्यक्रमा’मुळे गणपतराव देशमुखांची आठवण तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST

आटपाडी : पालकमंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच वासुंबे (ता. खानापूर) येथे कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर पुन्हा राष्ट्रवादीत परत ...

आटपाडी : पालकमंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच वासुंबे (ता. खानापूर) येथे कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर पुन्हा राष्ट्रवादीत परत यावेत, यासाठी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले. मतदारसंघात हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगितलेला अनुभव आठवतात; त्यांचे विधान किती खरे होते याची प्रकर्षाने जाणीव होते.

खानापूर- आटपाडी मतदारसंघ हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता; पण सध्या येथे राष्ट्रवादीची अवस्था बिकट आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील हे राष्ट्रवादीत असले तरीही मंत्री जयंत पाटील यांनी आमदार बाबर यांना पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन करून त्यांचीही गोची केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी जिल्ह्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही भाजपचा झेंडा सध्या खांद्यावर घेतला आहे.

आटपाडीत १९९१ पासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आयोजित होणाऱ्या पाणी परिषदेस अध्यक्ष म्हणून सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख हे उपस्थित राहत होते. यामुळे त्यांना या भागातील राजकारणाची जाण होती.

काही वर्षांपूर्वी आटपाडीतील काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी गणपतराव देशमुख यांची सांगोला येथे भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांबाबत देशमुख यांच्याशी चर्चा केली होती. यावर देशमुख म्हणाले होते की, यामागे राजकीय गणित असून खानापूर-आटपाडीतील आमदार बाबर, राजेंद्रअण्णा देशमुख किंवा सदाशिवराव पाटील या तिघांपैकी जे कोणी आमदार होतील, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा देतील. या दोन्ही पक्षांना जनतेची नव्हे, तर आमदारांची गरज असते. यामुळे स्थानिक नेते जोपर्यंत दुसरा पर्याय शोधणार नाहीत; तोपर्यंत तुमच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना तुमच्या भागाकडे लक्ष देण्याची गरज नाही.

हा धागा पकडला तर आमदार बाबर शिवसेनेत गेले आणि जयंत पाटील यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग लावल्याचे विधान गणपतराव देशमुख यांच्या अनुभवाचे बोल सत्यात आल्याची प्रचिती येत आहे.

चौकट

एका दगडात दोन पक्षी!

आमदार अनिल बाबर शिवसेनेचे आमदार असले तरी मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनकामात ते फारसे नसतात. सदाशिवराव पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये असले तरी त्यांनीही पक्ष मजबूत करण्यासाठी किती योगदान दिले; हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी सदाशिवराव पाटील यांना सूचक इशारा दिला आणि आमदार बाबर यांचे शिवसेनेत आणि भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील संबंधांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.