शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी चार महिने भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

जत पूर्व भाग : द्राक्ष, डाळिंब बागायतदार हवालदिल; पंचनाम्यांचा नुसताच फार्स...

राहुल संकपाळ - उमदी जत पूर्व भागात नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जत पूर्व भागातील उमदी, हळ्ळी, बालगाव, बोर्गी, मोरबगी, करजगी, बेळोंडगी, सोनलगी, सुसलाद, माणिकनाळ अशा अनेक गावांतील द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बागांचे ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांनी पंचनामे केले. परंतु पंचनामे करून व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन चार महिने पूर्ण झाले तरी, अद्याप शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी बागा जगविण्यासाठी बॅँकेकडून अथवा सावकारांकडून कर्जे काढली आहेत. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच मार्चअखेर असल्याने अनेक बॅँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावला आहे. एकीकडे पिकांचे नुकसान, तर दुसरीकडे कर्जफेड, या गोष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी नुकसान भरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक लहान-मोठ्या मागण्यांसाठी अनेक राजकीय नेते व पक्ष रस्त्यावर उतरले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र, शेतकऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जत पूर्व भागातील एकही राजकीय पक्ष अथवा नेता याबद्दल बोलून रस्त्यावर उतरायला तयार नाही. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी पंचनामे तयार केले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई लवकर द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


नेतेमंडळींची पाठ...
निवडणुकीपूर्वी अनेक लहान-मोठ्या मागण्यांसाठी अनेक राजकीय नेते व पक्ष रस्त्यावर उतरले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र, शेतकऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जत पूर्व भागातील एकही राजकीय पक्ष अथवा नेता याबद्दल बोलून रस्त्यावर उतरायला तयार नाही.