शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातीची द्राक्षे बेदाण्याला

By admin | Updated: April 1, 2015 00:01 IST

कमी दराचा परिणाम : जत तालुक्यातील चित्र

गजानन पाटील - संख -दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यासारख्या संकटांना तोंड देत सांभाळलेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षांच्या काढणीची धांदल जत तालुक्यात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाची कारणे सांगून बाजारात द्राक्षाचा दर पाडला आहे.
सध्या द्राक्षाला व्यापारी २५ ते ३0 रुपये किलो असा दर देत आहेत. महागडी औषधे, खते व मशागतीचा खर्च पाहता, हा दर परवडत नसल्याने बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बाजारात विक्री करण्यासाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांचाही बेदाणा केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच रब्बी हंगामाची सुगी सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंड्या माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. उमदी, बिळूर, तिकोंडी, संख, करजगी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, भिवर्गी, डफळापूर, मुचंडी, कोंत्येवबोबलाद, बालगाव, हळ्ळी आदी भागांत द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात ५०६० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. गतवर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुध्दा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा, तसेच टँकरद्वारे बागा जगविल्या होत्या. काही बागांना खोड जगविण्याएवढेही पाणी मिळाले नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना थोडेफार पाणी होते, त्यांनी बागा महत्प्रयासाने जगवून फळ आणले आहे.
आॅक्टोबरच्या १५ तारखेनंतर व शेवटच्या आठवड्यामध्ये छाटणी घेतली जाते. यावर्षी प्रतिकूल हवामान, ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागली. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. महागडी खते, औषधांचा वापर करुन दावण्या, घड, मणी गळीचा प्रतिबंध केला होता. अनेक अडचणींवर मात करीत द्राक्षबागा चांगल्या आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतले आहे. द्राक्षघड विरळ करण्यासाठी थिनिंग केले आहे. थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. द्राक्षघडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे.
किमान यंदा तरी द्राक्षांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना १ मार्चला अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच-सहा दिवस सोडून परत अवकाळी पाऊस झाला. याचाच गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजारात दर पाडला आहे. सध्या बाजारात २५ ते ३० रुपये दर मिळत आहे. परंतु सध्या खते, औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. मशागतीचा खर्च वाढला आहे. वीजबिल, मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे.


सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई
सध्या द्राक्षांची काढणी, बेदाणा वेचणी, पेटी पॅकिंग, वजन करणे आदी कामे मजुरांकरवी केली जात आहेत. दोन महिने मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्ष काढणीस महिलेला २०० रुपये, पुरुषाला ३०० रुपये मजुरी, तर बेदाणा वेचणीला किलोला दोन रुपये मजुरी मिळत आहे. एका दिवसाला एक महिला १७५ ते २०० किलो बेदाणा वेचणी करते. सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवत आहे.