शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक वळले आठवडा बाजारांकडे

By admin | Updated: March 17, 2015 00:07 IST

कडेगाव तालुक्यातील स्थिती : शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहतीला घरघर

रजाअली पीरजादे - शाळगाव शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत जवळजवळ बंद अवस्थेत असल्याने उद्योजक आता आठवडा बाजारांकडे वळले असून, त्यातून चांगल्या प्रकारची कमाई होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत सुरू झाली तेव्हा लहान-मोठे असे जवळजवळ १०० हून अधिक उद्योग सुरू झाले होते. नंतर याची संख्या वाढत जाऊन ५०० च्या घरात गेली होती. अशा परिस्थितीत शासनाच्यावतीने गारमेंट पार्क, टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यात आले. हा उद्योग मोठ्याप्रमाणात भरभराटीला आला. परंतु वस्त्रोद्योगाबाबत शासनाची धरसोडवृत्ती, मजुरांचा प्रश्न, वाढती मजुरी, वाढते वीजबिल आणि अशा परिस्थितीत बॅँक आॅफ इंडियाने थकित कर्जापोटी ठोकलेले टाळे या सर्व गोष्टींमुळे येथील उद्योजक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला. सुमारे १५०० मजूर बेकार झाले. उपासमारीची वेळ आली, साहजिकच अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले. लहान उद्योजकांवर संकट कोसळले. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजकांनी आणि बेकार मजुरांनी यावर आठवडा बाजार हे प्रभावी शस्त्र बाहेर काढले असून, त्यातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आता हळूहळू सुटू लागला आहे. असे जरी असले तरी गेली अनेक दिवस येथील औद्योगिक वसाहतीच्या समस्या सुरू असून, याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ही वसाहत बहरण्याऐवजी हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर दिसून येते.
यासाठी नवीन सरकार, स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, उद्योजक व बेकार मजुरांनी आपल्या उपजीविकेसाठी आता आठवडा बाजार सुरू केला असून, त्यातून त्यांची चांगली कमाई होऊन पोटापुरते मिळू लागले आहे. त्यामुळे उद्योजकांत उद्योग सुरू करण्यापेक्षा आठवडा बाजारांवरच अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.


शहरातील वस्तू ग्रामीण भागात उपलब्ध
शहरात मॉल संस्कृती फोफावत असताना त्याच धर्तीवर परंतु वेगळ्या पध्दतीने आता आठवडा बाजार भरताना दिसतात. सर्व व्यवहार रोख असल्याने उद्योजकांनाही परवडते. रोज एक बाजार असा आठवडाभर बाजार चालतो. त्यामुळे बेकारीचा प्रश्न रहात नाही. कमी-अधिक प्रमाणात दररोज पैसे मिळत असतात. पूर्वी कडेगाव तालुक्यात केवळ कडेगाव येथे एकच आठवडा बाजार भरत असे. आता जवळजवळ गावोगावी बाजार सुरू झाले आहेत. कडेपूर, शाळगाव, नेर्ली, देवराष्ट्रे, खेराडे-वांगी, नेवरी, चिंचणी या गावातून आता बाजार भरू लागले आहेत. एक हजारपासून पाच हजारापर्यंत माल असला की बऱ्यापैकी पैसे मिळतात. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांबरोबर आता शहरीकरणामुळे मोठे व्यावसायिकही आठवडा बाजारात उतरले आहेत. त्यामुळे शहरातील वस्तू आता ग्रामीण भागात मिळू लागल्या आहेत. साहजीकच शहराकडे बाजारासाठी जाणारे लोंढे आता कमी झाल्याचे दिसू लागले आहेत.