शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्यांसाठी शासनाकडे आग्रही

By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST

काळुजी बोरसे-पाटील : शिक्षक समितीचे मिरजेत त्रैवार्षिक अधिवेशन

लिंगनूर : शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक समिती आग्रही आहे. १ ली ते ७ वीच्या प्रत्येक शाळेस मुख्याद्यापक, विषय शिक्षकांना ४३०० ची वेतनश्रेणी, अंशदान योजनेत शासनाचे दान (वाटा) भरावयासाठी पाठपुरावा करणे यासह राज्यातील तमाम शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री व राज्य शासनाकडे नेटाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष काळुजी बोरसे-पाटील यांनी केले.
ते आज मिरज येथील शेतकरी भवनातील सभागृहात आयोजित शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
बोरसे-पाटील म्हणाले, राज्यातील आंतरजिल्हा बदलीत सुलभता यावी म्हणून राज्याचे रोष्टर बनवून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. १ ली ते ५ वी साठीही पदवीधर अध्यापक मिळाला पाहिजे, अंशदान योजनेत केवळ १ नोव्हेंबरनंतरच्या शिक्षकांच्या पगारातून कपाती सुरू आहेत; मात्र शासनाने आपला वाटा खात्यावर वर्ग केलाच नाही. त्यासाठी राज्य शासनाच्या अर्थ विभागाकडे तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मिरज तालुक्याची कार्यकारिणी अशी : तालुका नेते - हरिभाऊ गावडे, अध्यक्ष-कुबेर कुंभार, सरचिटणीस-सुरेश नरुटे, कार्याध्यक्ष-विकास चौगुले, उपाध्यक्ष-सहदेव बागी, सुभाष ओमासे, तात्यासाहेब बंडगर आदींची निवड केली. (वार्ताहर)

शिक्षक बँकेचे रणशिंग
याच त्रैवार्षिक अधिवेशनात आज शिक्षक बॅँकेच्या संचालक मंडळाने सर्व प्रकारच्या कर्जावरील दर अर्ध्या टक्क्याने कमी केला असल्याचे जाहीर केले; तर विरोधक करीत असलेल्या आरोपांवर विश्वास न ठेवता सभासदांनी योग्य पडताळा जरूर करावा, असे आवाहन करीत किरण गायकवाड यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.