शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा लाल फितीत

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

इस्लामपूर नगरपरिषद : सत्ताधारी राष्ट्रवादीपुढे कायद्याचे आव्हान

विकास आराखडा लाल फितीतइस्लामपूर नगरपरिषद : सत्ताधारी राष्ट्रवादीपुढे कायद्याचे आव्हान अशोक पाटील --- इस्लामपूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात वेळेत निर्णय दिला नाही. त्यामुळे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर हा आराखडा मंजूर केला आणि मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. यावर विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. यावर मालमत्ता धारकांच्या हरकतींवर नोटीस काढून शासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे बहुमतावर मंजूर केलेला विकास आराखडा पुन्हा एकदा लाल फितीत अडकला आहे.१९८0 पासून नियोजित विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २00३ मध्ये त्याला मुहूर्त लागला होता. परंतु सत्ताधाऱ्यांनी स्वत:च्या मालमत्ता वाचवून सर्वसामान्यांच्या घरांवर नांगर फिरविण्याचे काम केले. त्यामुळे जनतेतूनच या आराखड्याविरोधात उद्रेक झाला. नाईलाजास्तव हा आराखडा २00६ मध्ये रद्द करण्यात आला. यावर पालिकेने ४0 लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर २0१३ मध्ये नवीन आराखडा प्रस्तावित केला. यामध्ये २४५ भूखंडांवर आरक्षणे टाकली. ती टाकताना सत्ताधारी राष्ट्रवादीने बगलबच्चांचे भूखंड व्यवस्थित बाजूला काढून स्वत:च्या मालमत्ता अबाधित ठेवल्या. परंतु तोपर्यंत राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने आमदार जयंत पाटील यांच्या ताकदीवर उड्या मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जाऊन पालिकेच्या सभागृहात बहुमताच्या जोरावर आराखडा मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुन्हा एकदा २४३ मालमत्ता धारकांवर अन्याय झाला आहे.यावर शासनाने १४ आॅगस्ट २0१५ अन्वये ई. पी. / ९६ आरक्षणांवर हरकती मागवल्या आहेत. या हरकती देण्यासाठी ३0 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर केलेला आराखडा मंजुरीचा ठराव पुन्हा एकदा लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या वल्गना आणि विरोधकांच्या आरोपामुळे शहरातील मालमत्ताधारक संभ्रमावस्थेत आहेत.विरोधकांमध्ये समन्वयाचा अभावविकास आराखड्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय कुंभार कायदेशीर भूमिका मांडताना दिसतात. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांना अजूनही पालिकेच्या प्रशासनातील अनुभव नाही. त्यामुळे ते विकास आराखड्यावर काहीच बोलत नाहीत. भाजपचे युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील हा विकास आराखडा काही आरक्षणे उठवून मंजूर करू, अशी भूमिका मांडतात, तर काँग्रेसच्या वैभव पवार यांची भूमिका वेगळीच आहे. त्यामुळे विरोधकांच्यात एकमत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी हुकूमशाहीने हा आराखडा मंजूर केल्याचे स्पष्ट आहे.शासनाने २0१५ मध्ये शहराच्या विकास आराखड्याबाबत प्रसिध्द केलेली अधिसूचना पाहता, शहरातील ९ ते २४ मीटर व काहीअंशी ३0 मीटर रुंदीचे रस्ते आहेत तसेच ठेवले आहेत. बहुतांशी आरक्षणे जशीच्या तशी आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील भूखंड व घरे बाधित झाली आहेत. नियोजन समितीने काही रस्त्यांच्या हरकतींची दखलही घेतली नाही. त्यामुळे जाहीर केलेला विकास आराखडा अन्यायकारक आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.आम्ही सभागृहात मंजूर केलेला विकास आराखडा शासनाने रद्द केला नाही. सभागृहात मंजूर केलेला विकास आराखडा सद्यस्थितीतच राहील. या विकास आराखड्यावर कोणाच्याही तक्रारी नाहीत. यामध्ये विनाकारण राजकारण आणले जात आहे.- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष.विकास आराखड्यासंदर्भात नगरपरिषदेने सभागृहात जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय आपण शासनाला कळविलेला आहे. शासनाने १४ आॅगस्ट २0१५ रोजी काढलेले राजपत्र आम्ही नागरिकांसमोर उपलब्ध करुन दिले आहे. त्यांच्या हरकती आल्यानंतर शासन निर्णय घेईल.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी.