शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीग्रस्तांसाठी अधिवेशनात घोषणा!

By admin | Updated: March 6, 2015 00:53 IST

चंद्रकांत पाटील यांची माहिती : प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारणार

 सांगली : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उघडण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात काही ठिकाणी दुष्काळाने, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले
आहे. सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचे पंचनामे १० मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले आहेत.
केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राज्य शासनच आता यासाठी पुढाकार घेणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल आल्यानंतर यासाठी किती मदत द्यायची, याची घोषणा विधिमंडळातच करण्यात येईल.
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज समजण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारी घेण्यास मदत होणार आहे. अवकाळीने झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देताना शासन केवळ नियमावर बोट ठेवून काम करणार नाही. जास्तीत जास्त शेतकरी कसे उभे राहतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबरपासून अवकाळीने झालेल्या नुकसानीसाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अवकाळी व दुष्काळासाठी गेल्या वर्षभरात ४२०० कोटी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)