शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी

By admin | Updated: November 27, 2014 23:52 IST

जे. के. जाधव : रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारणे हिताचे

सांगली : साखर उद्योगासंदर्भात रंगराजन समितीच्या शिफारसी स्वीकारणे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, राजकीय अस्थिरतेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे. प्रामुख्याने शासनाने दोन साखर कारखान्यांमधील अंतर ठेवण्याची अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार बैठकीत केली. आमणापूर परिसरात कृष्णाकाठ अ‍ॅग्रो प्रोसेस लि. या नावाने खांडसरी व कारखान्याचा परवाना मिळाला असून, लवकरच त्यास प्रारंभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
साखर उद्योग निर्बंधमुक्त करण्याबाबतच्या शिफारसी रंगराजन समितीने केंद्र सरकारकडे केल्या असल्याचे सांगून जे. के. (बापू) जाधव म्हणाले, सर्वच साखर उद्योजकांनी तसेच शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही या शिफारशींचे स्वागत केले आहे. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांनीही याबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. तशा आशयाचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. महाराष्ट्र राज्य वगळून देशातील सर्व राज्यात रंगराजन समितीने केलेल्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहेत. तत्कालीन सरकारने दोन साखर कारखान्यांमध्ये ठराविक अंतर असावे, असे बंधन घातले आहे. परंतु या बंधनाची कोणतीच आवश्यकता नसल्याचे रंगराजन समितीने स्पष्ट म्हटले आहे. हा नियम घातक असून, विशिष्ट कारखान्यांसाठी उसाचे राखीव क्षेत्र निर्माण होण्यास यामुळे मदतच होणार आहे. दोन कारखान्यांमध्ये अंतराचे बंधन नसल्यास त्यांच्यात स्पर्धा होऊन गुणवत्तापूर्ण मालास चांगला दर मिळू शकेल. (प्रतिनिधी)

लवकरच कारखाना सुरु
कृष्णाकाठ अ‍ॅग्रो प्रोसेस खांडसरीच्या प्रकल्पास परवाना मिळाला असून, कारखाना काढण्यासही प्रशासनाची परवानगी मिळालेली आहे. पुढील गळीत हंगामात कारखाना सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त खर्च टाळून कारखाना काढण्यात येणार असल्याने इतर कारखान्यांपेक्षा १०० ते १५० रुपये जादा भाव देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.