शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

परिपत्रकासाठी एकरकमी योजनेला ‘ब्रेक’

By admin | Updated: July 16, 2015 23:28 IST

भू-विकास बँक : योजनांबाबतही संभ्रमावस्था कायम

अविनाश कोळी -सांगली -राज्यातील भू-विकास बॅँका बंद करण्याच्या निर्णयाबरोबरच कर्जवसुलीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या एकरकमी परतफेड योजनेला परिपत्रकाअभावी ‘ब्रेक’ लागला आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन दोन महिने उलटले तरी, यासंदर्भातील परिपत्रक न निघाल्यामुळे जिल्हा बॅँकांची संभ्रमावस्था वाढली आहे. भू-विकास बँकांच्या प्रश्नावर नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीने मे महिन्यात बँका बंद करण्याचा निर्णय घेतला. अवसायनाची प्रक्रिया राबविताना कर्जवसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना, कर्मचाऱ्यांची देणी, समायोजन, तसेच राज्य शासनाची एकूण वसुली कोणत्या माध्यमातून करायची, या गोष्टी निश्चित करण्यात आल्या. शासनाला भू-विकास बँकांकडून १९०० कोटी रुपये येणे आहेत, हा मुद्दा वारंवार चर्चेत आला. त्याच आधारावर शासनाने या बँका बंद करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असला तरी, यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक अद्याप निघालेले नाही. त्याच शासनाने येणी-देणी निश्चित केली नसल्याने गोंधळ वाढला आहे. राज्य भू-विकास कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करूनही शासनाकडून परिपत्रकाविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. राज्य भू-विकास कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार शासनाकडे येणी-देणी निश्चितीवर शिक्कामोर्तब करण्याची विनंती केली होती. मात्र आजअखेर शासनाकडून याबाबतची आकडेवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे केवळ शासनाच्याच थकबाकीची रक्कम चर्चेत राहिली. येणी-देणी निश्चित झाल्यानंतर राज्यभरातील बँकांच्या आर्थिक स्थितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील ११ बँकांच्या सक्षमतेवरही शिक्कामोर्तब होणार आहे. सक्षम आणि असक्षम बँका शासनाच्या आदेशाने अवसायनातच निघणार आहेत. ज्या बँका सक्षम आहेत, त्यांनाही राज्यभरातील हिशेबाच्या आकडेवारीची प्रतीक्षा लागली आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा शासनाविरोधात लढा उभारण्याची तयारी सक्षम बँकांच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे. ‘त्या’ संस्थांना भुर्दंडराज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ५ एप्रिल २०१३ रोजी कवठेएकंद येथील दोन पाणीपुरवठा संस्थांना सवलत दिली. २०१२ मध्ये या संस्थांचा हिशेब केला. त्यावेळी ९ कोटी ३९ लाख २० हजार थकबाकी होती. या निर्णयामुळे संबंधित संस्थांना नाहक तीन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. शासनाने जिल्ह्यातील अन्य पाणीपुरवठा संस्था सोडून कवठेएकंदच्या दोन्ही संस्थांनाच सवलत दिल्याने कर्मचारी संघटनेने याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ही बाब आता न्यायप्रविष्ट आहे. कर्जवसुलीस थंडा प्रतिसादबॅँका बंद करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केल्यामुळे थकबाकीदार कर्जदारांनी कर्ज परतफेडीबाबत निरुत्साह दाखविला. कर्जवसुलीवर कर्मचाऱ्यांच्या मोबदल्याची रक्कम अवलंबून असल्याने सध्याच्या वसुलीच्या स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.