शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक, नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विमा उतरविणे सोपे, पण नुकसानभरपाईची माहिती देऊन ती मिळविणे अवघड, असाच अनुभव गेल्या काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विमा उतरविणे सोपे, पण नुकसानभरपाईची माहिती देऊन ती मिळविणे अवघड, असाच अनुभव गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना येत आहे. शेतीचे नुकसान झाले तर त्याची विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार नोंदविण्याचा एकमेव पर्याय पूर्वी उपलब्ध होता, आता कृषी आयुक्तालयाने सहा सुलभ पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांच्या मनमानीला यातून चाप बसणार आहे.

शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन माहिती भरली, तर विमा कंपन्यांना त्याचा फायदा होत होता. संबंधित शेतकऱ्याचा दावा फोल ठरत होता. अशा परिस्थितीत शेतकरी कंगाल व विमा कंपन्या मालामाल अशी स्थिती दर वर्षी दिसत होती. या गोष्टींना आता मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागला आहे.

चौकट

आधी काय होते दोन पर्याय

योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत याबाबतची सूचना दिनांक, वेळ, नुकसानीची कारणे, प्रकार, प्रमाण व सर्व्हे नंबरसहित, विमा कंपनीकडे ऑनलाईन कळवायला लागत होती.

याशिवाय संबंधित बँक, कृषी किंवा महसूल विभाग किंवा टोल फ्री नंबरवरही माहिती देण्याची सोय होती.

चौकट

हे आहेत नवीन सहा पर्याय

शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.

तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी या कार्यालयात ऑफलाइन तक्रार करू शकतात.

नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही नोंदविता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा अर्ज द्यावा लागणार आहे.

पीक विमा कंपनीच्या मेल आयडीवरदेखील तक्रार करता येणार आहे.

ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे, त्या बँकेच्या शाखेत सुद्धा शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

चाैकट

जिल्ह्यात १०० कोटींहून अधिक नुकसान

जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी, गारपिटीमुळे सात हजार ९७६ शेतकऱ्यांच्या डाळिंब, द्राक्षे, केळी आणि आंबा फळपिकांचे शंभर कोटींहून अधिक नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊनही त्यांना शासनाकडून वर्षभरात भरपाईची रक्कम मिळाली नाही.