शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संतांचे सामाजिक कार्य..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 17:45 IST

संतांनी आपल्या आचार-विचारांतून, तत्वज्ञानांतून, अभंग-संकीर्तनातून महाराष्ट्राच्या या शुष्क माळरानावर भक्तीचे नंदनवन फुलविले. जातिभेदाच्या तटभिंती उध्वस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच धर्माने जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले..!

संतांनी आपल्या आचार-विचारांतून, तत्वज्ञानांतून, अभंग-संकीर्तनातून महाराष्ट्राच्या या शुष्क माळरानावर भक्तीचे नंदनवन फुलविले.  जातिभेदाच्या तटभिंती उध्वस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच  धर्माने  जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले..!

महाराष्ट्र हे भाग्यवंत राज्य आहे. ते यासाठी की, या राज्यांत अनेक संत जन्माला आले. समजा, जर आपल्या या देशात संत अवतीर्णच झाले नसते तर  माणूस माणसासारखा वागला असता का..?

आज ही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सदाचार संपन्न आहे. इथे मानवता, बंधुता, दया, सौजन्य, परोपकार या मूल्यांचे आचरण आहे, याला एकमेव कारण इथे जन्माला आलेले 'संत' हेच आहे..!

खरं तर, जीवाला कैवल्य प्राप्त व्हावे, मानवी मनाची सर्वांगीण उन्नती व्हावी, समाजातील अज्ञान, अंधःकार दूर व्हावा, समाज हा सदाचाराला प्रवृत्त व्हावा आणि दुराचारापासून परावृत्त व्हावा, याच कार्यासाठी संत या जगात अवतीर्ण होतात. महाराष्ट्राच्या पवित्र पुण्यभूमीत असेच अनेक अवतीर्ण झाले.

संतांनी आपल्या अभंगांतून, संतसाहित्यातून नुसतीच तत्त्वज्ञानाची शुष्क चर्चा केली नाही तर ते जे तत्वज्ञान सांगत होते तसे स्वतः आधी जगत होते, वागत होते..!

आधी केले मग सांगितले..!

म्हणूनच तर त्यांच्या वाणीत आणि साहित्यात समाज परिवर्तनाचं सामर्थ्य होतं. सत्पुरुषांच्या जीवन चरित्रांनीच देशाचा इतिहास समृद्ध होतो म्हणून तर संतांचे जीवन चरित्र हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अविभाज्य भाग बनला आहे..!

महापुरुष काही आकाशातून पडत नाहीत तर त्यासाठी वैचारिक क्रांती निर्माण व्हावी लागते. महाराष्ट्रातील संतमालिकेत जगद्गुरु तुकोबांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. तुकोबा म्हणजे साक्षात् भागवत धर्माचा कळसच..!

तुकोबांच्या अभंगवाणीमध्ये ज्याप्रमाणे आर्ततेने केलेला हितोपदेश आहे, त्याचप्रमाणे दांभिकतेवर केलेला प्रहारही आहे..! तुकोबांच्या काळात भक्ती क्षेत्रात सोंग-ढोंग, बुवाबाजी, कर्मकांड याला ऊत आलेला होता. खरी भक्ती लोप पावली जात होती. समाज जीवनात असहिष्णुता बळावली होती. अशा परिस्थितीत -

 

बुडते हे जन न देखवे डोळा ।

येतो कळवळा म्हणूनिया ॥

 

या अखंड तळमळीने तुकोबांनी आपले लक्ष समाजाच्या उद्धाराकडे वळविले आणि यासाठीच त्यांनी आपला देह चंदनासारखा झिजविला..!

 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

((लेखक ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी हे युवा कीर्तनकार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी- ८७ ९३ ०३ ०३ ०३.))

टॅग्स :spiritualअध्यात्मिक