शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

पार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 14:08 IST

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. ती व्यक्ती तोपर्यंत संतुष्ट राहते, जोपर्यंत त्याची दुसऱ्यांशी तुलना होत नाही. तुलना कधी कधी व्यक्तिमत्व विकासासाठी सहायक ठरते.

(Image Credit : bestlifeonline.com)

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. ती व्यक्ती तोपर्यंत संतुष्ट राहते, जोपर्यंत त्याची दुसऱ्यांशी तुलना होत नाही. तुलना कधी कधी व्यक्तिमत्व विकासासाठी सहायक ठरते. पण याने कुणाच्या भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. काही लोक प्रत्येक गोष्टी आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्यांशी करु लागतात. महिलांसोबत नेहमीच अशा गोष्टी होतात. जोपर्यंत महिला आपल्या पार्टनरसोबत आनंदी आहे. तोपर्यंत सगळंकाही ठिक असतं. पण जर जीवनात काही अडचणी आल्या तर त्या आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्या पुरुषांशी करु लागतात. याने नात्यात दरी निर्माण होते. त्यामुळे ही गोष्टी टाळायला हवी. 

अनेकांनी याबाबत लिहिले आहे की, एखादी व्यक्ती सुखी आणि संतुष्ट असते, पण जशी ती व्यक्ती स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी करु लागते, तेव्हा त्यांना दु:खी असण्याचं आणि अंसतुष्ट असण्याचं कारण मिळतं. सोशल सायन्सचे तज्ज्ञ लिऑन फेस्टिंगर यांचा सामाजिक सिद्धांत हे दर्शवतो की, तुलनेची भावना व्यक्तीमध्ये नैसर्गिक रुपाने आहे. या माध्यमातून व्यक्ती हे जाणून घेऊ शकतो की, तो किती चांगला आणि वाईट आहे. 

सकारात्मक स्पर्धा चांगली

तुलनेचे काही चांगले फायदेही आहेत. उदाहरणार्थ एखादा धावपटूसाठी २०० मीटरची रेस ५० सेकंदात पूर्ण करणे मोठी उपलब्धी असू शकते. पण जेव्हा तो हे बघतो की, दुसरा धावपटू तितकच अंतर ४० सेकंदात पूर्ण करतोय. तेव्हा त्याला हे कळतं की, त्याला त्यांच्या धावण्यात आणखी सुधारणा करायला हवी. यात सकारात्मक स्पर्धेची भावना आहे. जी चांगले असते. 

तुलनेला सीमा असावी

तुलनेची एक सीमा निश्चित असायला हवी. त्यापलिकडे जाऊन तुलना केली गेली तर मनाचं ओझं आणि दडपण वाढतं. तसेच दुसऱ्यांकडे जे आहे ते माझ्याकडे नाही, अशी भावना मनात येते. जर कुणात आधीच आत्मविश्वास कमी असेल तर दुसऱ्यांशी तुलना त्याला आणखी डिचवते. पण हे अबाधित सत्य आहे की, एखादी व्यक्ती जर यशस्वी, धनवान किंवा बुद्धीवान असल तर दुसरा त्याच्यापेक्षा अधिक मजबूत, धनवान, यशस्वी, मोठा, सुंदर, आनंदी आणि शक्तीशाली असतोच.

कशी करावी तुलना?

असे म्हणतात सुंदरता ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. याचा अर्थ हा होतो की, जे दिसत आहे, त्याच्यापेक्षा जो बघत आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. वास्तव हे आहे की, बघणाऱ्याचे डोळे केवळ चेहरा, उंची किंवा वजन इथपर्यंतच जाऊ शकते, त्याला हे कळत नाही की, समोरची व्यक्ती किती रागीत किंवा किती चांगली आहे. कोणताही व्यक्ती १०० टक्के दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतोच. 

१) या खेळात विजय मिळत नाही हा विचार करा. कोणत्याही वळणावर विजयाची जाणीव होऊ शकते. पण पुढच्याच वळणावर दुसरा मोठा, महान किंवा यशस्वी भेटतोच.

२) तुलनेऐवजी मेहनत, यश आणि काय करायचं आहे यावर जास्त लक्ष केंद्रीत करा. तुम्ही काही चांगलं केलं असेल तर स्वत:चं कौतुक करा. याने विचार प्रक्रिया सकारात्मक दिशेने नेण्यास मदत होईल. 

३) दुसऱ्यांप्रति सहज, सकारात्मक, उदार आणि मदतगार राहिल्याने स्वत:प्रति चांगली भावना निर्माण होते. तर टिका किंवा तुलनेमुळे दुसऱ्यांसोबतच व्यक्ती स्वत:प्रतिही क्रूर होतो.

४) कुणीही परिपूर्ण नसतं. पण याचा अर्थ हा नाही की, कुणी वाईट किंवा फालतू आहे. प्रत्येक व्यक्तीत कोणती ना कोणती विशेषता असतेच. फक्त ती ओळखणे गरजेचे आहे. 

५) गर्दीपासून वेगळं चालण्याची हिंमत ठेवणं सोपं काम नाहीये. असं तेच लोक करु शकतात जे अनावश्यक तुलनेच्या जाळ्यात अडकत नाहीत आणि असेच लोक काहीतरी वेगळं करु शकतात.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व