शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

लग्नानंतर येतात या ५ मुख्य समस्या, पण समजूतदार असाल तर वाचाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:41 PM

लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है.

लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है. म्हणजे लग्नानंतर जे नातं आपल्या समोर जे नातं असतं ते चांगलंही वाटतं आणि जेव्हा कुणी लग्न बंधंनात अडकतं तेव्हा स्थिती काही वेगळीच होते. कारण लग्नानंतरची स्थिती ही लग्नाच्या आधीसारखी नसते. आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर होणाऱ्या बदलांबाबत सांगणार आहोत. हे बदल तुम्हाला स्विकारावेच लागतात आणि जर याचा स्विकार तुम्ही केला नाही तर तुमचंय वैवाहिक जीवन अडचणीत येऊ शकतं.  

एकटेपणा दूर होणे

जर तुम्ही एकटे असाल तर लग्नानंतर तुमच्या आयुष्यातील हा एकटेपणा दूर होऊ शकतो. पण केवळ लग्न करणे हाच या समस्येचा उपाय नाहीये. जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की, लग्न केल्यावर तुमचा एकटेपणा दूर होतो तर तुम्ही चुकीचा विचार करताय. पण लग्नानंतर तुम्हाला असा एका साथीदार मिळतो, जो प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असतो. 

प्रायव्हसी हवीच

जवळपास सगळेच असं मानतात की, लग्न दोन व्यक्तींना जोडण्याचं काम करतं. पण लग्नानंतर सतत पार्टनरसोबत राहणं, कुठेही त्याला किंवा तिला एकटं जाऊ न देणं, स्वत:ही कुठे एकटं न जाणं, या सवयी चुकीच्या ठरु शकतात. सतत सोबत राहिल्याने दोघांमधील प्रेम वाढतं किंवा वाढेल असा विचार करणं चुकीचं आहे. कारण कधी कधी अशा वागण्याने समोरची व्यक्ती कंटाळू शकते. त्यामुळे लग्नानंतरही दोघांनीही एकमेकांच्या प्रायव्हसीला, स्वातंत्र्याला महत्त्व दिलं पाहिजे. 

लग्नानंतर सगळंच बदलतं

 

लग्नानंतर काही दिवसांपर्यंत नवरा-नवरी दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच रंगत बघायला मिळते. पण लग्नाच्या काही महिन्यांची सर्वकाही बदलतं. दोघेही एकमेकांकडे लक्ष देणं कमी करतात. पण याचा अर्थ हा नाही की, समोरच्या व्यक्तीला आकर्षण राहिलं नाही. हे बदल होण्याचं कारण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्यांमुळे झालेला बदल स्विकारण्यात फायदा असतो. कारण चेहऱ्याची रंगतच सगळंकाही नसतं. दोघांनीही हा बदल स्विकारणे यातच शहाणपणा आहे.  

वचने आणि प्रेम

(Image Credit : www.indiatvnews.com)

कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या... हे गाणं सर्वांनीच ऐकलं असेल. लग्नादरम्यान वेगवेगळ्या शपथा दोघेही घेतात. प्रेम टिकवण्यासाठी दोघेही नको नको त्या गोष्टी ठरवतात. पण लग्नानंतर प्रेमाचं रुप बदलतं. प्रेम कमी होतं असं नाही पण त्यात बदल होतो. अशात या गोष्टीसाठी तयार रहा. 

थोडं प्रेम, थोडा राग

लग्नाच्या काही वर्षांनी खूपकाही बदलेलं असतं. सुरुवातीला जे सगळं चांगलं चांगलं वाटतं, ते नंतर नसतं. लग्नाच्या काही महिन्यांनी दोघांमध्येही वेगवेगळ्या कारणांनी वाद होऊ लागतात. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की, लग्नचं केलं नसतं तर बरं झालं असतं, असाही एक सूर ऐकायला मिळतो. पण लग्न झाल्यावर हे छोटे छोटे वाद होणारच. त्यामुळे अशावेळी दोघांनीही शांततेने आणि समजूतदारपणे वागवं. तेव्हाच तुमचं नातं चांगलं राहिल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न