शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

लग्नानंतर येतात या ५ मुख्य समस्या, पण समजूतदार असाल तर वाचाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 14:58 IST

लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है.

लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है. म्हणजे लग्नानंतर जे नातं आपल्या समोर जे नातं असतं ते चांगलंही वाटतं आणि जेव्हा कुणी लग्न बंधंनात अडकतं तेव्हा स्थिती काही वेगळीच होते. कारण लग्नानंतरची स्थिती ही लग्नाच्या आधीसारखी नसते. आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर होणाऱ्या बदलांबाबत सांगणार आहोत. हे बदल तुम्हाला स्विकारावेच लागतात आणि जर याचा स्विकार तुम्ही केला नाही तर तुमचंय वैवाहिक जीवन अडचणीत येऊ शकतं.  

एकटेपणा दूर होणे

जर तुम्ही एकटे असाल तर लग्नानंतर तुमच्या आयुष्यातील हा एकटेपणा दूर होऊ शकतो. पण केवळ लग्न करणे हाच या समस्येचा उपाय नाहीये. जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की, लग्न केल्यावर तुमचा एकटेपणा दूर होतो तर तुम्ही चुकीचा विचार करताय. पण लग्नानंतर तुम्हाला असा एका साथीदार मिळतो, जो प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असतो. 

प्रायव्हसी हवीच

जवळपास सगळेच असं मानतात की, लग्न दोन व्यक्तींना जोडण्याचं काम करतं. पण लग्नानंतर सतत पार्टनरसोबत राहणं, कुठेही त्याला किंवा तिला एकटं जाऊ न देणं, स्वत:ही कुठे एकटं न जाणं, या सवयी चुकीच्या ठरु शकतात. सतत सोबत राहिल्याने दोघांमधील प्रेम वाढतं किंवा वाढेल असा विचार करणं चुकीचं आहे. कारण कधी कधी अशा वागण्याने समोरची व्यक्ती कंटाळू शकते. त्यामुळे लग्नानंतरही दोघांनीही एकमेकांच्या प्रायव्हसीला, स्वातंत्र्याला महत्त्व दिलं पाहिजे. 

लग्नानंतर सगळंच बदलतं

 

लग्नानंतर काही दिवसांपर्यंत नवरा-नवरी दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच रंगत बघायला मिळते. पण लग्नाच्या काही महिन्यांची सर्वकाही बदलतं. दोघेही एकमेकांकडे लक्ष देणं कमी करतात. पण याचा अर्थ हा नाही की, समोरच्या व्यक्तीला आकर्षण राहिलं नाही. हे बदल होण्याचं कारण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्यांमुळे झालेला बदल स्विकारण्यात फायदा असतो. कारण चेहऱ्याची रंगतच सगळंकाही नसतं. दोघांनीही हा बदल स्विकारणे यातच शहाणपणा आहे.  

वचने आणि प्रेम

(Image Credit : www.indiatvnews.com)

कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या... हे गाणं सर्वांनीच ऐकलं असेल. लग्नादरम्यान वेगवेगळ्या शपथा दोघेही घेतात. प्रेम टिकवण्यासाठी दोघेही नको नको त्या गोष्टी ठरवतात. पण लग्नानंतर प्रेमाचं रुप बदलतं. प्रेम कमी होतं असं नाही पण त्यात बदल होतो. अशात या गोष्टीसाठी तयार रहा. 

थोडं प्रेम, थोडा राग

लग्नाच्या काही वर्षांनी खूपकाही बदलेलं असतं. सुरुवातीला जे सगळं चांगलं चांगलं वाटतं, ते नंतर नसतं. लग्नाच्या काही महिन्यांनी दोघांमध्येही वेगवेगळ्या कारणांनी वाद होऊ लागतात. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की, लग्नचं केलं नसतं तर बरं झालं असतं, असाही एक सूर ऐकायला मिळतो. पण लग्न झाल्यावर हे छोटे छोटे वाद होणारच. त्यामुळे अशावेळी दोघांनीही शांततेने आणि समजूतदारपणे वागवं. तेव्हाच तुमचं नातं चांगलं राहिल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न