शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

लग्नानंतर येतात या ५ मुख्य समस्या, पण समजूतदार असाल तर वाचाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 14:58 IST

लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है.

लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है. म्हणजे लग्नानंतर जे नातं आपल्या समोर जे नातं असतं ते चांगलंही वाटतं आणि जेव्हा कुणी लग्न बंधंनात अडकतं तेव्हा स्थिती काही वेगळीच होते. कारण लग्नानंतरची स्थिती ही लग्नाच्या आधीसारखी नसते. आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर होणाऱ्या बदलांबाबत सांगणार आहोत. हे बदल तुम्हाला स्विकारावेच लागतात आणि जर याचा स्विकार तुम्ही केला नाही तर तुमचंय वैवाहिक जीवन अडचणीत येऊ शकतं.  

एकटेपणा दूर होणे

जर तुम्ही एकटे असाल तर लग्नानंतर तुमच्या आयुष्यातील हा एकटेपणा दूर होऊ शकतो. पण केवळ लग्न करणे हाच या समस्येचा उपाय नाहीये. जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की, लग्न केल्यावर तुमचा एकटेपणा दूर होतो तर तुम्ही चुकीचा विचार करताय. पण लग्नानंतर तुम्हाला असा एका साथीदार मिळतो, जो प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असतो. 

प्रायव्हसी हवीच

जवळपास सगळेच असं मानतात की, लग्न दोन व्यक्तींना जोडण्याचं काम करतं. पण लग्नानंतर सतत पार्टनरसोबत राहणं, कुठेही त्याला किंवा तिला एकटं जाऊ न देणं, स्वत:ही कुठे एकटं न जाणं, या सवयी चुकीच्या ठरु शकतात. सतत सोबत राहिल्याने दोघांमधील प्रेम वाढतं किंवा वाढेल असा विचार करणं चुकीचं आहे. कारण कधी कधी अशा वागण्याने समोरची व्यक्ती कंटाळू शकते. त्यामुळे लग्नानंतरही दोघांनीही एकमेकांच्या प्रायव्हसीला, स्वातंत्र्याला महत्त्व दिलं पाहिजे. 

लग्नानंतर सगळंच बदलतं

 

लग्नानंतर काही दिवसांपर्यंत नवरा-नवरी दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच रंगत बघायला मिळते. पण लग्नाच्या काही महिन्यांची सर्वकाही बदलतं. दोघेही एकमेकांकडे लक्ष देणं कमी करतात. पण याचा अर्थ हा नाही की, समोरच्या व्यक्तीला आकर्षण राहिलं नाही. हे बदल होण्याचं कारण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्यांमुळे झालेला बदल स्विकारण्यात फायदा असतो. कारण चेहऱ्याची रंगतच सगळंकाही नसतं. दोघांनीही हा बदल स्विकारणे यातच शहाणपणा आहे.  

वचने आणि प्रेम

(Image Credit : www.indiatvnews.com)

कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या... हे गाणं सर्वांनीच ऐकलं असेल. लग्नादरम्यान वेगवेगळ्या शपथा दोघेही घेतात. प्रेम टिकवण्यासाठी दोघेही नको नको त्या गोष्टी ठरवतात. पण लग्नानंतर प्रेमाचं रुप बदलतं. प्रेम कमी होतं असं नाही पण त्यात बदल होतो. अशात या गोष्टीसाठी तयार रहा. 

थोडं प्रेम, थोडा राग

लग्नाच्या काही वर्षांनी खूपकाही बदलेलं असतं. सुरुवातीला जे सगळं चांगलं चांगलं वाटतं, ते नंतर नसतं. लग्नाच्या काही महिन्यांनी दोघांमध्येही वेगवेगळ्या कारणांनी वाद होऊ लागतात. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की, लग्नचं केलं नसतं तर बरं झालं असतं, असाही एक सूर ऐकायला मिळतो. पण लग्न झाल्यावर हे छोटे छोटे वाद होणारच. त्यामुळे अशावेळी दोघांनीही शांततेने आणि समजूतदारपणे वागवं. तेव्हाच तुमचं नातं चांगलं राहिल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न