शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या मनातला भावनांचा कल्लोळ शांत कसा कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:41 IST

मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी या काही क्लृप्त्या..

ठळक मुद्देफ्रस्ट्रेशन, नैराश्य पॉझिटिव्हली कसं हाताळायचं हे मुलांना कळलं पाहिजे.प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील, हे मुलांना कळलं तर ते आव्हानांशी लढायलाही शिकतील.स्वसंवादाशिवाय आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या जमेच्या बाजू याविषयी नीटशी कल्पना येत नाही. या स्वसंवादासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.

- मयूर पठाडेलहान लहान मुलं.. अगदी शाळकरी, पण तरीही त्यांच्याही मनात भावनांचा कायमच कल्लोळ असतो. आजकालच्या फास्ट आणि अभासी जगात तर भावनांचा हा गुंता अधिकच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.आपल्याला वाटतं, मुलं लहान आहेत, त्यांना कसलं आलंय टेन्शन आणि चिंता, पण खरं तर या वयातलं टेन्शन आणि त्यांच्या भावनांचा निचरा योग्य वेळीच केला गेला नाही, तर पुढे आयुष्यभर या गोष्टी त्यांना त्रास देतात आणि याच ठिसूळ पायावर त्यांची भविष्याची इमारत उभी राहते, त्यामुळे मुलांच्या इमोशनल इंटेलिजन्सकडे अधिक गांभीर्यानं पाहाण्याची गरज आहे.मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स कसा वाढवायचा, हे आपण गेल्या भागात पाहिलं, या भागात त्याविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी..१- आजकाल कोणतीही मुलं पाहा, ती पटकन चिडतात, लगेच इमोशनल होतात, काही आपल्याशीच कुढतात, तर काही आदळआपट करतात.. त्यांच्यातल्या वागणुकीचाच बदल पालकांना लक्षात येतोच, पण त्यावर आपणही काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा कल्लोळ शांत कसा करता येईल याकडे आधी लक्ष द्यायला हवं. डिप ब्रिदिंग, एक ते शंभर आकडे मोजणं, त्या वातावरणातून थोडा वेळ त्यांना बाहेर नेणं.. यासारख्या गोष्टींनी आपल्या भावनांवर कंट्रोल करणं त्यांना शिकवता येईल.२- फ्रस्ट्रेशन, नैराश्य प्रत्येकालाच येतं, पण त्यावरची प्रतिक्रिया नकारात्मकच असली पाहिजे असं नाही. हे नैराश्य पॉझिटिव्हली कसं हाताळायचं हे मुलांना कळलं पाहिजे.३- प्रश्नांच्या भोवºयात गिरक्या मारत राहण्यापेक्षा हे प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील, त्यातून कसं बाहेर पडता येईल हे मुलांना कळलं तर ते आव्हानांशी लढायलाही शिकतील.४- प्रत्येक टप्प्यावर आपला आपल्याशी संवादही महत्त्वाचा असतो. स्वसंवादाशिवाय आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या जमेच्या बाजू याविषयी नीटशी कल्पना येत नाही. या स्वसंवादासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.५- भावभावनांचा सामना करताना काही क्लृप्त्याही वापरता येतील. प्रत्येक वेळी आपणच जिंूक किंवा हरू असं होत नाही. ‘विन-विन’ सिच्युएशन मात्र प्रत्येक वेळी आणता येते. ही परिस्थिती कशी आणता येईल याचं भान मुलांना आलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या भावना हाताळू शकतील.