शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही अनेकांच्या घरी भटजीविनाच गणरायाची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:39 IST

अरुण आडिवरेकर / रत्नागिरी : याहीवर्षी गणेशाेत्सवावर काेराेनाचे सावट राहिले आहे. त्यातच काेराेना प्रतिबंधक लसीचे डाेस पूर्ण न झालेल्या ...

अरुण आडिवरेकर / रत्नागिरी : याहीवर्षी गणेशाेत्सवावर काेराेनाचे सावट राहिले आहे. त्यातच काेराेना प्रतिबंधक लसीचे डाेस पूर्ण न झालेल्या भटजींनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर आराेग्याच्या काळजीपाेटी काही नागरिकांनी भटजीविना गणेश प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे याहीवर्षी अनेकांच्या घरी भटजीविना गणरायाची प्रतिष्ठापना हाेणार आहे.

गणेश चतुर्थीला घराेघरी भटजींच्या हस्ते पूजाविधी करून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. त्यामुळे सकाळपासूनच घराेघरी लगबग सुरू झालेली असते. गतवर्षी काेराेनाच्या पहिल्या लाटेत काेराेनाची रुग्णसंख्या अधिक राहिल्याने भटजींनी घराेघरी जाणे टाळले हाेते. तर काहींनी गणेशभक्तांच्या हट्टापायी पीपीई किट घालून पूजा सांगितली हाेती. काहींनी स्वत:च गणरायाची पूजा केली हाेती. काेराेनाचे संक्रमण अजूनही कमी झालेले नाही. त्यामुळे याहीवर्षी गणेशाेत्सव काेराेनाच्या निर्बंधांमध्ये साजरा करावा लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावलीही जाहीर केली आहे. त्यातच काेराेना प्रतिबंधक लसीची निर्मिती केल्यानंतर काेविशिल्ड आणि काेवॅक्सिन हे दाेन डाेस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ८ लाख २१ हजार डोस देण्यात आले आहेत. यापैकी पहिला डोस ५ लाख ७५ हजार तर २ लाख ४६ हजार ४३२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

लसीचा तुटवडा, त्यातच ऑनलाईन नाेंदणीत येणारे अडथळे यामुळे अनेकांना लस मिळण्यास विलंब हाेत आहे. त्यातही पाैराेहित्य करणाऱ्या सर्वच भटजींनी लसीच्या दाेन्ही मात्रा घेतलेल्या नाहीत. त्यामुळे गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी अनेकांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही गणेशभक्तांकडून काेराेनाच्या भीतीमुळे भटजींना न येण्याची सूचना केली आहे. या साऱ्यामुळे यावर्षीही भटजीविनाच गणरायाची प्रतिष्ठापना करावी लागणार आहे.

--------------------------

गतवर्षी कोरोनाची जी परिस्थिती होती, त्या तुलनेत यावर्षीची खूप नियंत्रणात आहे. तरीही सर्वच भटजी खबरदारी घेऊन पूजापाठ करत आहेत. सर्वांनी लसीकरणाचे डोस घेतले असून, पूजापाठ करण्यासाठी जाताना संबंधित कुटुंबांची चौकशी करूनच तेथे जात आहेत. काही कुटुंब स्वतःहून येऊ नका, असे सांगतात. त्यामुळे काही ठिकाणचा पूजापाठ रद्दही झाला आहे.

- विठ्ठल चितळे, चिपळूण.