शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील ८४ गावांच्या पाणीटंचाईसाठी केवळ सव्वा काेटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

राजापूर : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ८४ गावांतील २४४ वाड्यांचा सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला ...

राजापूर : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ८४ गावांतील २४४ वाड्यांचा सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून केवळ सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून काही ठरावीक गावांमधील पाणीपुरवठ्याची कामे होणार असून, उर्वरित गावांची तहान कशी भागविणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या आराखड्यामध्ये त्या-त्या गावात पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाय-योजना सुचविण्यात येतात. राजापूर पंचायत समितीतर्फे यावर्षी तालुक्यातील ८४ गावातील २४४ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश करून या गाव-वाड्यांमध्ये टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चाचा जंबो आराखडा तयार केला होता. या टंचाई आराखड्यामध्ये वडवली, शिवणे बु., धोपेश्वर, देवाचेगोठणे, नाटे, शिवणे खुर्द, मोगरे, गोवळ, तेरवण, भू, कशेळी, तुळसवडे, वाटूळ, कोंडीवळे, येरडव, काजिर्डा, करक, ताम्हाणे, कोंढेतड, ओझर, रायपाटण, ओशिवळे, कोळवणखडी, वाटूळ, परटवली, परूळे, मूर, झर्ये, मिळंद, सावडाव, पाचल, मिठगवाणे, साखरीनाटे, साखर, कारवली, मोसम, डोंगर, गोठणेदोनिवडे, हरळ, पुंभवडे, हसोळतर्फ सौंदळ, सोल्ये, जवळेथर, केळवली, कोदवली, मोरोशी, शिळ, ओणी, गोवळ, उन्हाळे, पेंडखळे, तळगाव, कोंडये, दोनिवडे, पडवे, दळे, मठखुर्द, आंगले, मोसम, आडवली, वडदहसोळ, येळवण, हातदे, कुवेशी, आजिवली, खरवते, सौंदळ, जैतापूर, धाऊलवल्ली, सागवे, महाळुंगे, भालावली, जुवाठी, जुवेजैतापूर, तळवडे, तारळ, चौके, कळसवळी, वाडापेठ, राजवाडी, विलये, नाणार, अणसुरे व चिखलगाव या गावांचा समावेश आहे.

या गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यासाठी विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, नळपाणी योजना नवीन करणे, सार्वजनिक विहिरी खोदणे, दुरुस्ती करणे, साठवण टाकी बांधणे, दुरुस्ती करणे, बंधारे बांधणे, गाळ उपसणे, तसेच आवश्यकता भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करणे अशी ढीगभर कामे सुचविण्यात आली होती. राजापूर पंचायत समितीने सुचविलेल्या या ढीगभर कामांसाठी जिल्हा परिषदेने केवळ मूठभर निधी मंजूर केल्याने हा आराखडा केवळ दिखावा ठरला आहे. पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या १९ कोटी ४६ लाख रुपयांच्या टंचाई आराखड्यापोटी जिल्हा परिषदेकडून केवळ १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून २४४ वाड्यांपैकी काही ठरावीक वाड्यांमध्येच पाणीपुरवठ्याची कामे होणार आहे.