शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोनाचा त्रास कमी करण्यासाठी त्यातल्या त्यात प्रभावी उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोनाचा त्रास कमी करण्यासाठी त्यातल्या त्यात प्रभावी उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लसीकरणाला आता काहीशी गती येऊ लागली आहे. सुरुवातीपासून कासवगतीने होणाऱ्या लसीकरणाला आता चांगलाच वेग आला असून, ऑगस्ट महिन्यात दोन्ही डोसच्या सुमारे १ लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत.

जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाला आता खऱ्या अर्थाने गती आली असली तरी अजून जिल्ह्यात केवळ १६ टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे.

जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या फळीतील कोरोना योद्धे आणि ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू झाले. अगदी मार्चअखेरपर्यंत लसीकरणाला गती आली नव्हती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात गैरसमजच अधिक होते. त्यामुळे ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही प्रतिसाद कमी होता. मात्र शिमग्यानंतर दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला आणि अचानक लोकांना लसीकरणाचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून लसीकरणासाठी सर्व केंद्रांवर रांगा दिसू लागल्या.

ज्यावेळी लोकांना लसीकरणाचे महत्त्व कळले, त्यावेळेपासून डोस कमी प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे लसीकरणाच्या कामात चांगलाच खंड पडू लागला. मे महिन्यात तर कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईतील लोकही लसीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर येऊ लागले होते. मात्र डोसची उपलब्धता खूप कमी असल्याने अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी त्यावरून वाद झाले.

ऑगस्ट महिन्यात मात्र डोस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लसीकरणाने आता चांगला वेग घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात रोज लस उपलब्ध होती. एका दिवशी सर्वाधिक २१ हजारांहून अधिक लसीकरण झाले. १ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार २१४ लोकांनी पहिला तर १ लाख १२ हजार ५२१ लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. ३१ ऑगस्ट रोजी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ४ लाख ९१ हजार ६३७ इतकी तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या २ लाख १० हजार ३४३ इतकी झाली आहे. पहिल्या मात्रेच्या संख्येत १ लाख १० हजार ४२३ तर दुसऱ्या मात्रेच्या संख्येत ९७ हजार ८२२ लोकांची भर पडली आहे.

सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे. दोन्ही लस घेतलेल्यांना जरी कोरोना झाला तरी त्याची लक्षणे सौम्य असतात. दुसरी लाट प्रभावी झाल्यानंतर त्याचे महत्त्व लोकांना कळले आहे.