शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने विश्रांती घेताच उकाडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

रत्नागिरी : कधी मुसळधार तर कधी विश्रांती, असा पावसाचा जिल्ह्यात खेळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेताच पुन्हा ...

रत्नागिरी : कधी मुसळधार तर कधी विश्रांती, असा पावसाचा जिल्ह्यात खेळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेताच पुन्हा उकाड्याला प्रारंभ झाला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १९२.८० मिलीमीटर (सरासरी २१.४२ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.

बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. तर कधी पावसाची विश्रांती सुरू आहे. हवामान खात्याने २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या काही तालुक्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे.

रविवार ते मंगळवार असे तीन दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बुधवारी उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर होता. अन्य तालुक्यांमध्ये कधी जोरदार तर कधी तुरळक सरींनी पाऊस पडत होता. शुक्रवारी मात्र, पावसाने दिवसभर पूर्ण विश्रांती घेतली होती. रात्रीही तसा तुरळकच पाऊस पडला. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही नुकसानीची नोंद झालेली नाही.