शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरसाठी तीन कोटींची भरपाई

By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST

तहसील कार्यालय : ३ हजार ८८६ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गुहागर : गुहागर तालुक्यातील ३ हजार ८८६ शेतकऱ्यांना तब्बल ३ कोटी २ लाख ७४ हजार ८५४ रुपये आंबा व काजू नुकसानभरपाई आली आहे. मात्र, त्याच्या वाटपाबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने वाटपामध्ये सावळागोंधळ होण्याची शक्यता आहे. या नुकसानभरपाई वाटपाची जबाबदारी कृषी विभागाऐवजी महसूल विभागाकडे देण्यात आली असून, प्रत्येकाच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा होणार आहे.यावेळच्या अवेळी पावसामुळे गुहागर तालुक्यातील २९/८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा क्षेत्र १९९१.८१ हेक्टर काजू क्षेत्र ९२६.२० हेक्टर आहे. आतापर्यंतच्या आलेल्या नुकसानभरपाईच्या वाटपामध्ये स्पष्ट निर्देश होता. परंतु यावेळी आलेल्या नव्या वाटपामधील जीआरमध्ये कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने वाटपाबाबत सावळागोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सन २०११ सालामध्ये मिळालेल्या ४ कोटी २ लाख रुपये नुकसानाच्या निधीचे वाटप गुहागर तालुका कृषी विभाग गत महिन्यापर्यंत करत होते. मे महिन्यात ५० हजार रुपये नुकसानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. सातबारावर कसणारा वेगळाच असल्याने तसेच ज्याची आंबा बागायत आहे, मात्र नावे सर्वांची आहेत, अशांना ही रक्कम वाटली जात असल्याने निर्माण झालेल्या वादामध्ये तालुक्यातील दोन कोटी नुकसानभरपाई रक्कम परत केली होती. एका शेतकऱ्याला कमीत कमी १ हजार रुपये रक्कम मिळाली, तर सातबारावरील जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंचीच नुकसानभरपाई देऊ शकतो, असे नियम होते. पंरतु यावेळी वाटपाबाबतचे कोणतेच निकष नसून या नुकसानभरपाईची रक्कम महसूल विभागाकडे देण्यात आली आहे.दमऱ्यान, महसूल विभागाने तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांचे सातबारा उतारे, सातबाऱ्यावर असलेल्या व्यक्तींचे खाते क्रमांक यांची माहिती मागवली असून, सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. एकत्र सातबारा असला तरी त्यामध्ये बागायती मात्र एकाचीच असल्याने महसूल विभागाकडून वाटप करण्यात येणारी आॅनलाईन रक्कमही सर्वांनाच मिळणार आहे. परिणामी कुटुंबामध्ये अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्याची बागायत त्यालाच ही रक्कम मिळेल असे सर्वे करताना कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवकांकडून सांगण्यात आले. परंतु ही रक्कम आॅनलाईन जमा होणार असल्याने आता प्रत्येकाला खाते उघडावे लागणार आहे. कोणतेही निकष नसल्याने या नुकसानभरपाईच्या वाटपाला नक्की कोणते निकष लावणार असा सवाल अनुत्तरीतच आहे. (वार्ताहर)