शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

Ratnagiri news: सार्थक म्हणाला ‘साहेब, माझा बस पास हरवलाय, तक्रार द्यायची आहे’; विद्यार्थ्याचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:54 IST

पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत एसटी पास हरवल्याचा दाखलाही त्याला तयार करुन दिला

संदीप बांद्रेचिपळूण : पोलिस स्थानकात जायचे म्हटल्यावर मोठ्या माणसांनाही घाम फुटतो; पण जेव्हा तेरा वर्षांचा चिमुरडा पोलिस स्थानकात जाऊन आपला बस पास हरवल्याची तक्रार करतो, तेव्हा ही गोष्ट कौतुकास्पद वाटते. चिपळूणच्या कापसाळ येथील सार्थक संजय जमदाडे याने हे धाडस केलं. एसटीचा पास हरवला म्हणून शुक्रवारी दुपारी तो तक्रार देण्यासाठी थेट पोलिस स्थानकात पोहोचला. अर्थात त्याच्या या वागण्याचे कौतुक वाटलेल्या पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत एसटी पास हरवल्याचा दाखलाही त्याला तयार करुन दिला.पोलिस म्हणजे हातात काठी, करडा आवाज अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. त्याविषयी लहान मुलांमध्ये प्रचंड भीती असते. बरीच मुलं रडलं किंवा एखादा हट्ट धरला, तर पालक पोलिसांचे नाव घेऊन वेळ मारून नेतात; परंतु या गोष्टीचा मुलांच्या मनावर लहानपणापासूनच परिणाम होतो. त्यातून पोलिसांविषयी भीती निर्माण होते. ही भीती आयुष्यभर राहते. त्यामुळे पोलिस स्थानकात जाऊन तक्रार देणे सोडा, अनेकजण पोलिस स्थानकात जाणेही टाळतात; परंतु नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन कोणतीही भीती न बाळगता पोलिसांपर्यंत यावे, यासाठी पोलिस प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. त्याचे चांगले परिणाम आता हळूहळू होताना दिसत आहेत.शुक्रवारची घटनाही अशीच काहीशी होती. चिपळूण शहरालगतच्या कापसाळ येथील रहिवासी असलेल्या सार्थक संजय जमदाडे या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा एसटी पास हरवला. त्यामुळे गडबडलेल्या सार्थकने थेट पोलिस स्थानक गाठले. पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर गेल्यानंतर मात्र तो गोंधळला. नेमके काय करावे हेच त्याला कळेनासे झाले. तेवढ्यात तो पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या नजरेस पडला. त्यांनी जवळ बोलावून विचारपूस केली. तेव्हा त्याने घाबरत घाबरत माझा एसटी पास हरवला आहे. मला तक्रार द्यायची आहे, असे सांगितले.

तेव्हा शिंदे यांनी त्या चिमुरड्याला आपल्या कक्षात नेले आणि ठाणे अंमलदारांना बोलावून घेत अवघ्या पाच मिनिटांत त्याला एसटी पास हरवल्याचा दाखला दिला. त्यानंतर त्याला नवीन पास मिळवण्याची प्रक्रिया सांगितली. त्याचवेळी सार्थकचे कौतुक करत कोणीही न डगमगता पोलिसांची मदत घ्यावी, हेच आमचे ध्येय असल्याचा संदेश सोशल मीडियावरून दिला.

पोलिसांविषयी भीती मुळीच असता कामा नये. भीती आदरयुक्त असायला हवी. त्यासाठी पोलीस व नागरीक यांच्याच संवाद होण्याची गरज आहे. त्याच ध्येयाने आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे या विध्यार्थ्याने कौतुक करावेसे वाटले. त्यातून आम्ही आमच्या प्रयत्नात यशस्वी होत असल्याची जाणीवही झाली. -रवींद्र शिंदे, पोलिस निरीक्षक, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसStudentविद्यार्थी