शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 1:50 PM

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा पडद्यामागील डाव

रत्नागिरी : प्रकल्प होत असताना विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी पुढे यायचे, असा दुटप्पीपणा रिफायनरी प्रकल्पाबाबत कोणी करू नये. कोकणातील रोजगार निर्मितीसाठी रिफायनरी प्रकल्पाची गरज आहे. तो ठरलेल्या ठिकाणीच होईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. लवकरच रिफायनरीसाठीच्या जमिनीचा दर सरकार जाहीर करेल, असेही त्यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणासाठी काजू बोर्ड मंजूर केले आहे. आंबा बोर्डाबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. त्यालाही सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. काजू बोर्डासाठी १३५० कोटी रुपये देणार आहोत. २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून काजू लागवडीला, प्रक्रिया उद्योगाला मोठा हातभार लागेल, असे ते म्हणाले. काजू बोंडावर प्रक्रिया झाली तर त्यातून उत्पन्नही वाढेल आणि कोकणातील लोकांना कोकणातच रोजगार मिळू शकेल. त्याबाबतही सरकार प्राधान्याने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.मुंबई-गोवा महामार्गाचे काम यापूर्वीच होणे अत्यावश्यक होते. मात्र, ठेकेदाराकडून ते झाले नाही. त्याचा पाठपुरावा आता सुरू आहे. ते काम लवकर पूर्ण करून घेण्याची सूचना आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना केली आहे. संपर्काच्या दृष्टीने, दळणवळणाच्या दृष्टीने महामार्ग लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातून पर्यटनालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे ताे लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.कोयना अवजलाचा वापर कसा करता येईल, याबाबतचा आढावा घेण्याची सूचना आपण जलसंपदा विभागाच्या सचिवांना केली आहे. जर या पाण्याचा वापर करता आला तर बारमाही पिकेही घेता येतील. त्यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.रिफायनरी विरोधकांच्या गाड्या रोखल्याबारसू रिफायनरी प्रकल्प विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी रत्नागिरीत येत असताना भाट्ये पुलावर त्यांच्या तीन गाड्या अडविण्यात आल्या. या सर्वांना पुन्हा परत पाठवून पावस येथील पोलिस चौकीत बसवून ठेवण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेnanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना