शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी़.ने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलंय ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोना रुग्णांची ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कडक निर्बंध जारी करण्यात आले. अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी़. सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एस.टी़.तील गर्दी ओसरली आहे. गेल्या दीड महिन्यात प्रवासी संख्या घटली, शिवाय फेऱ्या कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. दीड महिन्यात १९ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा तोटा रत्नागिरी विभागाला सोसावा लागला आहे.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करीत असले तरी, ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने अन्य प्रवाशांना एस.टी.त प्रवेश दिला जात आहे. गतवर्षी एस.टी.त चढलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. आता सॅनिटायझर देणे बंद केले आहे. मात्र वाहकच प्रवाशांना सॅनिटायझर हाताला लावले का? हे विचारत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक असतील तर वाहक स्वत:कडील सॅनिटायझर देत आहेत. शिवाय एका सीटवर एकानेच बसावे, मास्क हनुवटीवर नको तर नाक-तोंड झाकेल असा लावा, असे सांगावे लागते. वास्तविक एस.टी.त अन्य प्रवाशांना नाकारण्यात येत असले तरी, वाडी-वस्तीवरील ज्येष्ठ, वयस्कर मंडळींना पर्यायी साधन नसल्यामुळे एस.टी.त प्रवेश द्यावाच लागत आहे.

गेल्या दीड महिन्यात फेऱ्या घटल्यामुळे एस.टी़.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक भुर्दंड सोसत एस.टी़. प्रवाशांना सेवा देत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक फेरीनंतर एस.टी़.चे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

सर्वाधिक वाहतूक चिपळूण मार्गावर

रत्नागिरी, चिपळूण, पोफळी मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शासकीय, खासगी सेवेतील कर्मचारी, अधिकारी एस.टी़.तून प्रवास करीत आहेत.

देवरूख-रत्नागिरी, रत्नागिरी-लांजा, रत्नागिरी-राजापूर या मार्गावरही प्रवासी संख्या अधिक असल्याने एस.टी.ला चांगले भारमान लाभत आहे. शिवाय अन्य प्रवाशांचीही वर्दळ सातत्याने सुरू असते.

शासनाकडून खासगी वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले असल्याने एस.टी.ला चांगले दिवस आले होते. मात्र लाॅकडाऊनमुळे एस.टी़.चे आर्थिक चक्र पुन्हा बिघडले आहे. अत्यावश्यक सेवा देत असताना तोटा सोसावा लागत आहे.

ना मास्क, ना सॅनिटायझर...

गतवर्षी एस.टी.त चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. मास्क नसणाऱ्या प्रवाशाला मास्कही दिला जात होता. आता मात्र सॅनिटायझर दिले जात नाही. मास्क हनुवटीला अडकवून एस.टी.त चढणाऱ्या प्रवाशांना जरूर वाहकांकडून हटकले जाते.

१९ कोटीचा ताेटा

प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने गेल्या दीड महिन्यात रत्नागिरी विभागाला १९ कोटी सात लाख ५० हजाराचा तोटा सोसावा लागला आहे. लाॅकडाऊन संपेपर्यंत आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागेल.

प्रवासी घरातच

‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक संचारबंदीमुळे अनावश्यक फिरताना आढळल्यास कारवाई होत असल्याने, नागरिक घराबाहेर पडणेच टाळू लागल्याने एस.टी.चे प्रवासी सध्या घरातच आहेत.

अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू ठेवण्यात आली असली तरी, भारमानाअभावी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे बिघडलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा झटका बसला. प्रवाशांच्या बेफिकिरीमुळे एस.टी.चे कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे एस.टी.त प्रवेश देताना सॅनिटायझर लावा, मास्क नीट लावा, एका सीटवर एकानेच बसा अशा सूचना वारंवार द्याव्या लागत आहेत. आठवडाभराचे कडक लाॅकडाऊन असल्याने आणखी झळ सोसावी लागणार आहे.

- मनाली साळवी, वाहक

प्रवासी सेवेसाठी कार्यरत असलेल्या एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कडक संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू असली तरी, त्यातून मिळणारे उत्पन्न जेमतेम आहे. बुडत्या एस.टी.ला सध्या तरी मालवाहतुकीचा एकमेव आधार आहे. त्यामुळे महामंडळाने एस.टी. स्वावलंबी होऊन उत्पन्न मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. गतवर्षीपासून एस.टी.चे उत्पन्न खालावत आहे. ते सुधारण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न व्हावेत, अन्यथा तोटा वाढणारच आहे.

- मंगेश देसाई, चालक